PostImage

Vaingangavarta19

Feb. 8, 2025   

PostImage

एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन


एका इसमाने बलात्कार करून महिलेचा गळा दाबून केला खुन

नागपूर:-

 एका इसमाने बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ३३ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली आहे. सध्या महिलेच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या पुरूषाने महिलेसोबत दारू प्यायली होती. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती केल्यानंतर त्याने तिचा गळा दाबून खून केला.

हुडकेश्वर पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली होती. परंतु जीएमसीएचमधील फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केली आणि असे आढळून आले की महिलेच्या मानेवर गळा दाबण्याच्या खुणा होत्या आणि त्यासाठी बळाचा वापर करण्यात आला होता.

सदर  महिलेचे अनेक लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला काही वर्षांपूर्वी तिच्या पती आणि मुलीसह नागपूरला आली होती. नागपूरला आल्यानंतर त्यांचे अनेक लोकांशी संबंध निर्माण झाले होते. आतापर्यंतच्या तपासात किमान दोन नावे समोर आली आहेत. पतीव्यतिरिक्त, पोलिसांना इतर अनेक लोकांवरही संशय आहे.

आरोपी महिलेच्या घरी वारंवार येत असे तपासादरम्यान, पोलिसांना असे आढळून आले की आरोपी अनेकदा महिलेच्या घरी येत असे. दोघेही तिथे एकत्र दारू प्यायचे. तो त्या महिलेला काही पैसे देऊन निघून जायचा. हत्येच्या दिवशी महिलेने आणखी पैशांची मागणी केली. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. आरोपीने रागाच्या भरात महिलेचा गळा दाबून खून केला.
अधिक तपास पोलीस करीत आहेत


PostImage

MH 33 NEWS

Feb. 8, 2025   

PostImage

_दिल्लीत भाजपचे सरकार आल्याने गडचिरोलीत जल्लोष; फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाने …



गडचिरोली – भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन केल्याने गडचिरोली शहरात उत्साहाचे वातावरण होते. या आनंदोत्सवाच्या निमित्ताने इंदिरा गांधी चौकात भाजपच्या वतीने भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून, मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी "भारतीय जनता पक्ष जिंदाबाद" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या जल्लोषात माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, समन्वयक प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीताताई हिंगे, ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनंदलवार, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिषभाऊ पिपरे,आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष डॉ.नितिनजी कोडवते,डाँ.चंदाताई कोडवते,  शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड, तसेच विवेक बैस, विनोद देवोजवार, अनिल करपे,विशाल हरडे,जिल्हा सचिव वर्षा शेडमाके, पल्लवी बारापात्रे, अविनाश विश्रोजवार, अर्चना चन्नावार,सिमा कन्नमवार, भुपेश कुळमेथे, मंगेश रणदीवे, गुंडु सरदार, हरीश माकडे, दीपक सातपुते,बारसागडे ताई,आखाडे आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा केला. या सोहळ्यामुळे संपूर्ण गडचिरोली शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

दिल्ली विधानसभा निवडणूक: अरविंद केजरीवाल अन् मनिष सिसोदियांना पराभवाचा धक्का


Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा (Parvesh Varma) यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव झाला. याशिवाय दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी मार्लेना (Atishi Marlena) विजयी झाल्या आहेत. 

 

 

 

अरविंद केजरीवालांना मोठा धक्का

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केलाय. 

 

मनीष सिसोदियांचा पराभव

तर, जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आम आदमी पक्षाने माजी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपकडून तरविंदर सिंग मारवाह (Tarvinder Singh Marwah) आणि काँग्रेसकडून फरहाद सुरी निवडणूक रिंगणात उतरले होते. मनीष सिसोदिया हे पहिल्यांदाच जंगपुरा येथून मैदानात उतरले होते. याआधी ते पटपडगंजमधून निवडणूक लढवत होते. यावेळी पक्षाने शिक्षणतज्ज्ञ अवध ओझा यांना पटपडगंजमधून उमेदवारी दिली होती. जंगपुरा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. या जागेवर भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी 1844 मतांनी विजय मिळवला आहे.  

 

 

भाजपची वाटचाल बहुमताच्या दिशेने

दरम्यान, सध्याच्या कलानुसार भाजपने (BJP) दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आये . आपचे (AAP) प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हातातून दिल्ली निसटल्याचे चिन्ह दिसत आहे. सध्या दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्लीत भाजप 48, आप 22 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस एकाही जागेवर आघाडीवर नाही. त्यामुळे दिल्लीत आपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 


PostImage

MH 33 NEWS

Feb. 8, 2025   

PostImage

माता रमाई आंबेडकर जयंती साजरी


         गडचिरोली:- सम्राट अशोक बुद्ध विहार अशोकवन कालनी गोकुळनगर गडचिरोली येथे माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुनिता लाटीलवार होत्या प्रमुख  अतिथी  अमिता भैसारे , कृष्णा भैसारे ,  प्रेमलता कान्हेकर , सध्या अलाम होत्या . अमिता भैसारे म्हणाल्या की . रमाईचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आजच्या महिलांनी समाज घडविल्यास आदर्श नागरिक तयार होतील . त्यामुळे भारताची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही . या प्रसंगी कृष्णाजी भैसारे , प्रेमलता कान्हेकर ,सुनिता लाटीलवार,    सध्या अलाम , स्मिता म्हशाखेत्री यांनी आपले विचार मांडले . 
     सुरुवातीलां  त्रिशरण पंचशिल ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सचालन बेबी उदिरवाडे यांनी केले . प्रास्ताविक प्रियंका साखरे यांनी केले तर आभार युविका गोवर्धन यांनी मानले .
       या कार्यक्रमाला कल्याणी गोंडाणे , शुभांगी देवगडे , कल्पना अंबादे, कोमल  भैसारे , सुकेशिनी रामटेके , लक्ष्मी साळवे , मंगला बाबनवाडे , वृशाली उंदिरवाडे , भोजराज कान्हेकर , दामोधर शेंडे , भिमराव गोंडाणे , यशोधरा शेंडे , माया जनबंधू , अरुणा उंदिरवाडे , निशा बोदेले , संगिता मेश्राम , किरण निकोसे , रंजना मेश्राम , सुरेखा ठाकूर व समाज बांधव उपस्थित होते .


PostImage

MH 33 NEWS

Feb. 8, 2025   

PostImage

बोधीवृक्ष परिसर सेमाना रोड येथे रमाई जयंती साजरी



       
         गडचिरोली:- बोधीवृक्ष परिसर सेमाना रोड गडचिरोली येथे माता रमाई जयंती साजरी करण्यात आली . या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल उराडे होते तर प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर  बामसेफ    जिल्हाध्यक्ष , प्रमोद राऊत एम एन टिव्ही चॅनल , संपत गोडबोले ' मोतीराम  कोटांगले होते . या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल उराडे  म्हणाले की , डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना रमाई पत्नी मिळाल्याने समाजाचा फार मोठा उध्दार झाला . तसेच      भोजराज कान्हेकर बामसेफ जिल्हाध्यक्ष म्हणाले की, माता रमाईच्या त्यागामुळे डॉ .बाबासाहेब आबेकडकरांना समाजाची सेवा करण्यास अधिक प्रेरणा मिळाली . येवेळी प्रमोद राऊत , संपत गोडबोले , मोतिराम कोटांगले योनी आपले विचार व्यक्त केले .
      या कार्यक्रमाचे संचालन तुळशिराम सहारे यांनी केले . प्रास्ताविक भगवान राऊत यांनी केले तर आभार नामदेव दुधे यांनी मानले .
     या कार्यक्रमात विजया धुरके , वैशाली मेश्राम , आचल जुनघरे , ज्योती उराडे , लता रामटेके , नलीनी दुधे , पदमा कांबळे , मोतीराम कोटांगले , दिपीका रायपूरे, शांताबाई खोब्रागडे उपस्थित होते .


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

लग्न झालेल्या वहिनीला घेऊन पळाला पण...


Crime News : अनैतिक संबंधांचे प्रकार अलीकडे खूप घडू लागले आहेत. हे प्रकार समाजस्वास्थ्य बिघडल्याचं लक्षण आहे. तसंच, त्यातून कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले. त्यानंतर ती नितनवास गावात राहणाऱ्या रामराज केवट याच्या संपर्कात आली. रामराज तिला आपल्याबरोबर तमिळनाडू राज्यात कोईमतूरमध्ये घेऊन गेला. तिथे ते दोघं जण बराच काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले; मात्र त्यानंतर तो अचानक तिला तिथेच ठेवून आपल्या घरी परतला. येताना तो तिचा मोबाइल फोनही आपल्याबरोबर घेऊन आला. पीडित महिलाही नंतर त्याला शोधत त्याच्या घरी आली. तेव्हा त्याच्या घरच्यांनी तिला पकडून ठेवलं. मध्य प्रदेशातल्या श्योपूर इथल्या वीरपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली. त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी या घटनेबद्दल माहिती दिली.

 

आरोपी रामराज याची पत्नी आणि त्याच्या अन्य कुटुंबीयांनी पीडित महिलेला पकडून ठेवलं. तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला मारून टाकण्याचं नियोजनही ते करू लागले. नशिबाने तेवढ्यात त्या महिलेच्या मुलाने प्रसंगावधान राखून 100 नंबर डायल केला आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. त्यानंतर पोलिसांनी पीडित महिलेला आरोपींच्या तावडीतून सोडवलं. त्यानंतर चौघांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. त्या पीडित महिलेने असा आरोप केला आहे, की आरोपी तिला मारून तिचा मृतदेह चंबळ नदीत फेकण्याचं प्लॅनिंग करत होते.

 

 

 

पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची केस दाखल केली नाही; मात्र त्याच्या कुटुंबातल्या तीन महिलांसह चौघांवर केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितलं, की आरोपीच्या कुटुंबातल्या महिलांनी पीडितेला मारहाण केली आहे. तसंच, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मारहाणीचा एक व्हिडिओही मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर पोलिसांकडून कारवाई केली जाणार असून, अधिक तपास सुरू आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

सहायक पोलीस निरीक्षकाने केली २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी


नागपूर : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रार अर्जावर गैरअर्जदारावर गुन्हा दाखल न करणे आणि प्रकरण मिटवून देण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाने २ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाचेची रक्कम स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ही कारवाई दुपारी दोन वाजताच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यात करण्यात आली. परमानंद दादाराव कात्रे असे लाचखोर पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कवठा गावातील जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार सुनंदा ठाकरे यांनी केला होता. त्या जमिनीचा संयुक्त मालक असलेल्या गैरअर्जदाराने जमिनीच्या विक्रीपत्रात फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या संदर्भात सुनंदा ठाकरे यांनी कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तो तक्रार अर्ज कोराडी ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे यांच्याकडे आला होता. त्यांनी त्यांच्या लेखनिकाला अर्ज निकाली काढण्यासाठी गैरअर्जदाराला पोलीस ठाण्यात बोलविण्यास सांगितले होते.

 

 

आठवडाभरापूर्वी तो युवक पोलीस ठाण्यात आला. सहायक निरीक्षक (एपीआय) प्रेमानंद कात्रे यांनी ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल न करणे आणि तपासात सहकार्य करणे तसेच गुन्हा दाखल करण्याऐजवी तक्रार करणाऱ्या सुनंदा ठाकरे यांचीच समजूत घालून तक्रार अर्ज मागे घेण्यास लावण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बदल्यात दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी केली. त्या युवकाने लाचेची रक्कम देण्यास नकार दिला. तसेच प्रकरण आपसातील असून आम्ही गावातच सरपंच आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सोडवितो, असे सांगितले. त्यामुळे एपीआय प्रेमानंद हे त्या युवकावर चिडले. त्याला गुन्हा दाखल करुन लगेच अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली.

 

 

 

कोराडी पोलीस ठाण्यातच अटक

सहायक पोलीस निरीक्षक प्रेमानंद कात्रे हे कोराडी पोलीस ठाण्यातच कार्यरत आहेत. त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन लाखांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदार युवकाने एसीबी कार्यालयात तक्रार केली. बुधवारी दुपारी कोराडी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. तक्रारदार युवकाकडून एपीआय प्रेमानंद कात्रे यांनी दोन लाख रुपये स्विकारताच एसीबीने त्यांना अटक केली. लाचेची रक्कम जप्त करुन कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. एसीबीने एपीआय कात्रे यांना कोराडी पोलीस ठाण्याच्याच कोठडीत डांबले. त्यांच्या घरी झडीत घेऊन काही कागदपत्रे जप्त केल्याची माहिती आहे.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न


गडचिरोली : दारुच्या आहारी गेलेल्या पतीने विद्युत खांबावर आकडा टाकून घरात झोपलेल्या होमगार्ड पत्नीला विद्युत शॉक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नी वाचली. चामोर्शी तालुक्याच्या नागपूर (चक) या गावात ५ फेब्रुवारीला हा थरार घडला. याप्रकरणी चामोर्शी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला असून पती फरार आहे. आशा माणिक सोयाम (४०) असे त्या होमगार्ड महिलेचे नाव आहे. त्या माहेरी नागपूर (चक) येथे वास्तव्यास आहेत.

 

पती संतोष मारोती शेडमाके (४५,रा. धानापूर ता. गोंडपिपरी जि.चंद्रपूर) हा मजुरी काम करतो. गेल्या काही दिवसांपासून तो दारुच्या आहारी गेलेला आहे. यातून तो आशा सोयाम यांच्याशी सतत वाद घालायचा.

 

दरम्यान, ५ फेब्रुवारी रोजी त्या घरी झोपलेल्या होत्या. पहाटे दोन वाजता संतोष शेडमाके हा घराच्या छतावर चढला. त्याने विद्युत खांबावरुन आकडा टाकून वीज घेतली व लाकडी काडीच्या सहाय्याने कवेलू बाजूला सारुन आशा यांना शॉक दिला. त्यांना जाग आल्यावर त्यांनी पाहिले असता कवेलून संतोष डोकावल्याचे दिसले. यानंतर त्यांनी आरडाओरड केली असता त्याने धूम ठोकली. आरोपी पती संतोष हा सतत दारूच्या नशेत असतो. यातूनच दोघात खटके उडायचे. यापूर्वीही त्याने अशाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

याबाबत आशा सोयाम यांनी फिर्याद दिली. त्यावरुन चामोर्शी ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) १०९, ३५१ (२) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी फरार असून तपास उपनिरीक्षक सुमेध बनसोडे करत आहेत.

 

यापूर्वीही केला प्रयत्न

२९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष शेडमाके याने घराच्या समोरील चाफ्याच्या झाडाला डिझेल टाकून आग लावली, यावेळी आशा सोयाम यांनी आरडाओरड केल्यावर तो पळून गेला. याबाबत त्यांनी तेव्हाच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आशा सोयाम यांच्या पतीचे २००५ मध्ये निधन झाले, तर संतोष शेडमाके याने पत्नीशी फारकत घेतली. २०१५ पासून या दोघांनी पुनर्विवाह केला व एकत्रित राहू लागले. मात्र, नंतर संतोषला व्यसन जडले व त्यातून दोघांत खटके उडू लागले.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

गडचिरोली सीमेवर आला 'बर्ड फ्लू'


 

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील मांगली गावातील गावठी कोंबड्यांना बर्ड फ्लू या आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. बर्ड फ्लूचा जिल्ह्यातही शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

तीन वर्षापूर्वी गडचिरोली शहरात बर्ड फ्लू या आजाराने शिरकाव केला होता. त्यावेळी आरोग्य यंत्रणा व पशुसंवर्धन विभागाची चांगलीच धावपळ झाली होती. गडचिरोली शहरातील अनेकांच्या घरी असलेले पाळीव पक्षी मारून टाकण्यात आले होते. तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

ब्रह्मपुरी तालुक्यातूनच कोंबड्यांचा पुरवठा

गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा या तालुक्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील फार्मवरून बॉयलर व कॉकलेर कोंबड्यांचा पुरवठा होतो. मांगली हे गाव ब्रह्मपुरी तालुक्यातच आहे. या रोगाचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

लागण झालेल्या पक्ष्यांमध्ये दिसतात ही लक्षणे

 

अंडी उत्पादन कमी होणे, शिंकणे व खोकणे, डोळ्यातून पाणी येणे, डोक्यावर सूज येणे, पंख नसलेला भाग निळसर पडणे, भूक मंदावणे, उदासीनता आदी लक्षणे लागण झालेल्या पक्ष्याला दिसून येतात. तत्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

 

असा होतो संसर्ग

 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, बर्ड फ्लू हा कुक्कुट पक्ष्यांना विषाणूमुळे होणारा रोग असून, संसर्गजन्य आहे. यात सर्वात संसर्गजन्य 'स्ट्रेन एच ५ एन १' आहे. बर्ड फ्लू विषाणूचा प्रसार एका कुक्कुट पक्ष्यातून दुसऱ्या कुक्कुट पक्ष्यांमध्ये मुख्यतः हवेतून पसरतो.

 

 

बर्ड फ्लूबाबत पशुधन विकास अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. नागरिकांनी सुध्दा सहकार्य करावे.

अजय ठवरे,जिल्हा पशुधन विकास अधिकारी

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

आंबेशिवणी शेतशिवारातील कारवाई जखमी जी-18 वाघाचा केला सुरक्षित रेस्क्यू


 

गडचिरोली, ब्युरो. गडचिरोलीवनविभागात मागील अनेक महिन्यांपासून दहशत माजविणारा जी-18 नावाचा वाघ जखमी अवस्थेत असल्याची माहिती मिळताच, शुक्रवारी (दि.7) सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने घटनास्थळ गाठित वाघाचा सुरक्षित रेस्कू केला. जखमी अवस्थेतील वाघाला उपचारार्थ चंद्रपूर येथे रवाना करण्यात आले आहे. सदर यशस्वी रेस्कू आंबेशिवणी शेतशिवारात करण्यात आला. अमिर्झा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या आंबेशविणी शेतशिवारात जी-18 आष जखमी अवस्थेत फिरत असल्याचा माहिती वनकर्मचाऱ्यांनी गुरुवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार या जखमी वाघाच्या हालचालीवर वनकर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवली होती. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सुमारास वनविभाग व आरआरटी पथकाने संबंधित घटनास्थळ गाठित जखमी वाघास सुरक्षितरित्या पकडून पिंजऱ्यात कैद केले. जखमी वाघाची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे तपासणी करुन पुढील उपचारार्थ चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ जखमी होण्याचे निश्चित कारण वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. पशुवैद्यकीय अधिकारी टिटीटी चंद्रपूर यांच्या अंतिम अहवालानंतरच वाघाच्या जखमीचे कारण स्पष्ट होणार असल्याचीमाहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई उपवनसंरक्षक शैलेश मीणा, सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात चातगाव वनपरिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांचेसह आरआरटी पथकाने पार पाडली.

 

गडचिरोली वनविभागात घेतले चौघांचे बळी?

 

आंबेशिवणी शेत परिसरात जखमी अवस्थेत रेस्क्यू करण्यात आलेल्या जी-18 या वाधाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केले असता, या जंगल परिसरात 3 ते 4 नागरीकांचे बळी घेणारा हाच तो वाघ असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासंदर्भात उपवनसंरक्षक शर्मा यांना विचारणा केली असता, नागरीकांचे बळी घेणारा तो हाच वाघ असावा अशी शंका आहे. मात्र खात्रिशीर सांगता येणार नसल्याचे सांगितले.

 

 

 


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

हातभट्टीवर पोलिसांची धाड; हजारोंचा माल जप्त


 

 

अलोणी शेतशिवारात डीबी पथकाची कारवाई

गडचिरोली, ब्युरो, गडचिरोली पोलीस ठाणे हद्दीतील अलोणी गावातील शेतशिवारात, मोहफुलाची दारूची भट्टी बेकायदेशीरपणे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच डीबी पथकाने गुरुवारी (दि.6) धाड टाकून दारुभट्टी उच्वस्त करीत 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद यशवंत मडावी रा. अलोणी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलोणी गावातील शेत शिवारालगत असलेल्या नाल्याजवळ मोहफुलाची दारु काढल्या जात असल्याची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या डीबी पथकाने सदर शेतशिवारात धडक दिली. यावेळी एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत निदर्शनास आली. अधिक तपासणी केली असता याच आवारात दारूची भट्टी आढळून आली. सदर दारुभट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी घटनास्थळावरुन सात ड्रममध्ये भरलेला 350 किलो अंदाजे किंमत 24 हजार रुपये किंमतीचा मोहफुल सडवा, 12 हजार रुपये किमतीची 40 लिटर मोहाची दारू, असा एकूण 36 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी अरविंद मडावी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोब्रागडे, राजेंद्र पुरी, वृषाली चव्हाण यांनी पार पाडली.


PostImage

विदर्भ फायर न्यूज

Feb. 8, 2025   

PostImage

भरधाव बोलेरोच्या धडकेत दुचाकीवरील शिक्षक ठार


 

गडचिरोली, ब्युरो. भरधाव वेगात असलेल्या बोलेरो वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षक ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) रात्री 8 वाजताच्या सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर असलेल्या टोल नाक्याजवळ घडली. सदानंद मष्णाजी अब्दागिरे (41) मुळ गाव जि. नांदेड (हल्ली मु. हनुमान वार्ड, चामोर्शी) असे मृतक शिक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक शिक्षक सदानंद अब्दागिरे हे चंद्रपूर जिल्ह्यातील गेवरा बु. येथील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी रात्रीच्या सुमारास एम. एच. 26 ए. एल. 0710 क्रमांकाच्या

 

दुचाकीने गडचिरोली येथून चामोर्शीकडे जात होते. दरम्यान गडचिरोली चामोशी मार्गावरील टोल नाक्याजवळ भरधाव वेगात येत असलेल्या एम. एच. 40 एसी 8140 बोलेरोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. अपघात प्रकरणी बोलेरो वाहन चालक राजकी रोशन शेख (37) रा. गणेश कॉलनी, गडचिरोली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बंडू मारबोनवार करीत आहेत.

 


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार …


दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रोडच्या कडेला दगडावर धडकली दुचाकी , दुचाकीस्वार जागीच ठार 

 

 पुसदः शहरासह तालुक्यात अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे. दर एक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात घटना घडत आहे. दोन दिवसा अगोदर काटखेडा व कासोळा येथे भीषण अपघात घडले या घटनेला ४८ तास उलटले असताना आज निंबी जवळील भवानी टेकडी जवळ एका अपघातात हिवाळी (त) येथील दुचाकीस्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव मनोज बळीराम आडे वय ३६ वर्ष रा. हिवळनी (त) ता. पुसद जि. यवतमाळ असे आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, आज दि.६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी अंदाजे ९:०० वाजण्सुयाच्या सुमारास हिवळणी येथील रहिवासी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय ३६वर्ष हा मुलांच्या शिक्षणासाठी पुसद येथे राहत होता. तो सकाळी पुसद वरून हिवाळी येथे आपल्या होंडा यूनिकॉर्न दुचाकी क्रमांक एम एच २९सिजी १७७०गावी जात असताना शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या निंबी जवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या वळणाच्या रस्त्यावर या दुचाकीस्वराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली. व दुचाकीस्वार दगडावर जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती स्थानिक प्रथम दर्शनीनी वसंत नगर पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. असता या अपघातात मृत्युमखी पडलेल्या इसमाची ओळख पटवली व मृतदेह शासकीय उपजिल्हा पुसद येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांच्यामार्फत रस्त्याच्या सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते, तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता. हे सुद्धा तेवढेच सत्य. घटनेचा उर्वरित तपास वसंत नगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या


जन्मदातेनेच विष देऊन आपल्या मुलाची केली हत्या 

 

 गुजरात : गुजरातमधील अहमदाबादमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने आपल्या १० वर्षांच्या मुलाला पाण्यात विष मिसळून पाजलं. या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या हत्येनंतर ४७ वर्षीय आरोपीने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. आरोपी पित्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.

अहमदाबादमध्ये एका पित्याने १० वर्षांच्या मुलाला सोडियम नायट्रेट नावाचे विषारी द्रव्य पाजून त्याची हत्या केली. अहमदाबादच्या बापूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. कल्पेश गोहेल याने आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याने तसे केले नाही.

मंगळवारी झालेल्या घटनेनंतर गोहेलला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कृत्य करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, वडिलांनी उलट्या थांबवण्यासाठी मुलगा ओम आणि १५ वर्षांची जियाला औषध प्यायला दिले होते. यानंतर वडिलांनी सोडियम नायट्रेटयुक्त पाणी ओमला प्यायला दिले.

आरोपीने आपल्या मुलांना विष देऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता, परंतु आपल्या मुलाची बिघडलेली प्रकृती पाहून तो घाबरला आणि घरातून पळून गेला. पाणी प्यायल्यानंतर लगेचच मुलाला उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर कुटुंबियांनी मुलाला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यानंतर मुलाला मृत घोषित केले. कल्पेश गोहेल हा त्याची दोन मुले, पत्नी आणि आई-वडिलांसह राहत होता. कल्पेश गोहेलने आधी आपल्या दोन मुलांना औषध दिले आणि नंतर पत्नी बाहेर असताना त्याने आपल्या मुलाला विषयुक्त पाणी प्यायला लावले.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी …


 


 मार्कंडा यात्रेत भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून नियोजनाचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

गडचिरोली, दि. 6: महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पिण्याचे पाणी, निवास, विशेषत: स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेसंबंधी सर्व आवश्यक उपाययोजना भाविकांच्या गरजा आणि मागण्यांचा विचार करून वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले.
मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्र व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित होणाऱ्या यात्रेच्या पूर्वनियोजना आढावा जिल्हाधिकारी यांनी आज मार्कंडा येथील धर्मशाळेत घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी रणजित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप, तहसिलदार प्रशांत गोरूडे, गटविकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच सरपंच आणि मार्कंडा व चपराळा येथील मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यात्रेच्या दरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसह सर्व मूलभूत सोयी सुविधा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश दिले. यात्रेच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, तसेच धर्मशाळांची दुरुस्ती करण्यात यावी. तसेच वैद्यकीय सुविधांसाठी औषधांचा पुरेसा साठा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती, तसेच रुग्णवाहिका आणि अग्निशमन यंत्रणा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय, भाविकांसाठी अधिकच्या बसेसची व्यवस्था, अखंडित वीजपुरवठा, पथदिवे, मोबाइल शौचालयांची व्यवस्था आणि स्वच्छतेवर विशेष भर द्यावा असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष सोय
महाशिवरात्री यात्रेला हजारो भाविक येतात, त्यामुळे दर्शनासाठी लागणाऱ्या दीर्घ रांगांमध्ये स्तनदा माता व वयोवृद्धांसाठी विशेष रांगेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तसेच उन्हापासून बचावासाठी शेड आणि जागोजागी पाणपोई उभारण्याचे नियोजन करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
दर्शनाची वेळ वाढविण्याची मागणी
बैठकीत मार्कंडेश्वर मंदिरात यात्रेदरम्यान दर्शनाची सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ वाढवून २४ तास सुरू ठेवावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली. यावर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणांसोबत चर्चा करून वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याचे निर्देश

सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून यात्रेच्या तयारीत कोणताही अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला महसूल, पोलिस, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत, दूरसंचार, अन्न व औषध प्रशासन, ग्रामपंचायत, परिवहन आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

अतीवेगात तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच …


अतीवेगात  तिहेरी दुचाकीस्वारने दिली उड्डाणपूलाच्या संरक्षक कठड्यास धडक ,एक जागीच ठार तर दोन गंभीर 

 

 


भद्रावती(दि.6 फेब्रुवारी) :- तिघेजन बसून भरधाव दुचाकी उडान पुलाच्या कठड्यास जोरदार धडकल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा घटनास्थळीत मृत्यू झाला. असून दोघे युवक गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना दि.५ बुधवार ला रात्री ११ वाजता शहरातील हायवे वरील उडान पुलाजवळ घडली. जखमी दोन्ही युवकांना चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

अमोल भिंगारदिवे वय २२, सुजल बहादे व लहू धोटे हे तीन युवक नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीने शहरातील पंचशील नगरातून हायवे कडे भरधाव वेगाने जात असताना सदर दुचाकी उडान पुलाच्या भिंतीला आदळली.या अपघातात अमोल भिंगारदिवे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुजल बहादे व लहू धोटे हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले, मृतक ला ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे, शवविच्छेदन साठी पाठवण्यात आले. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या


अल्पवयीन मलीचे एका तरुणाने केले अपहरण मात्र पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

 

 राहुरी:-

कोणीही आपल्या मुला, मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये- पो. नि. ठेंगे.काही दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. राहुरी पोलिस पथकाने या घटनेचा तपास करुन अपहरण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळून जेरबंद केले. 

राहुरी तालुक्यातील मोकळा येथील विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ या आरोपी तरुणाने एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केल्याची घटना घडली होती. या घटने संदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात आरोपीवर पॉक्सो गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपीने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले होते.स दरील गुन्ह्यातील आरोपी विकी उर्फ विकास प्रकाश शिरसाठ, वय २४ वर्षे, रा. मोकळ मोहोळ, ता. राहुरी, याला राहुरी पोलिस पथकाने दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी अटक केली. आरोपीस न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी रिमांड घेण्याची तजवीज चालू आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे हे करीत आहेत.

अशा घटना टाळण्यासाठी राहुरी पोलिसांनी सर्व नागरिकांना आव्हान केले आहे की, कोणीही आपल्या मुला अथवा मुलीचे लग्नाचे वय पूर्ण झाल्या शिवाय त्यांचा विवाह करू नये. अन्यथा त्यांच्यावर व लग्न जुळणारे आई-वडील सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होतो. सर्व ग्रामपंचायत, पोलीस पाटील, ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आपापल्या क्षेत्रामध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक चारुदत्त खोंडे, पोलीस हवालदार सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, सतिष कुऱ्हाडे , गोवर्धन कदम, अंकुश भोसले, इफ्तेखार सय्यद, सचिन ताजने आदि पोलिस पथकाने केली.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा …


घरात का घुसता म्हणून विचारले असता सासू व सुनेला दोघा इसमाने केली मारहाण, पोलीसांनी केला दोघांवरही विनयभंगाचा गुन्हा दाखल 

राहुरी:-
तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत, असे म्हणालेचा राग आल्याने आरोपींनी सासू व सुनेला शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली. अनिता विजय बोरकर, वय ३० वर्षे, रा. वांबोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी १०.४५ वा. चे सुमारास अनिता बोरकर व त्यांची सासु उषा अण्णासाहेब बोरकर अशा दोघीजणी त्यांच्या घरात स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी आरोपी बोरकर यांच्या घरात घुसले व म्हणाले की, तुझा नवरा कोठे आहे, असे म्हणुन ते शिवीगाळ करु लागले. त्यावेळी अनिता बोरकर यांची सासु उषा त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, आमचे माणसे घरी नाहीत. असे म्हणालेचा त्या दोघांना राग आला. त्यांनी दोघींना शिवीगाळ दमदाटी करत हाथाच्या चापटीने मारहाण केली.
 अनिता बोरकर यांच्या गळयातील मनीमंगळसुत्र ओढुन नुकसान केले. तसेच सासु उषा यांच्या गळयातील मणीमंगळसुत्र झटापटीत तुटुन गहाळ झाले आहे. त्यानंतर पुन्हा आमचे नादी लागलातर एका एकाला जिवे ठार मारुन टाकु, अशी आरोपींनी धमकी दिली. अनिता विजय बोरकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी भाऊसाहेब जनार्धन शेळके व राहुल जर्नाधन शेळके, दोघे रा. वांबोरी, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३ (५), ३२४ (४), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर


आदिवासी विकासासाठी ४८२ कोटी ३६ लाखांचा प्रारूप आराखडा सादर

 


प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाची हमी आणि गाव तेथे रस्त्याचे नियोजन करा- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके 

 

गडचिरोली, दि. ६: आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने ४८२ कोटी ३६ लाख रुपये इतक्या निधीच्या प्रारूप आराखड्याची मागणी शासनाकडे सादर केली आहे. हा आराखडा जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे. या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.

निधीवाढीसह प्रस्ताव सादर
गडचिरोली जिल्ह्यासाठी पूर्वी १९७ कोटी ९६ लाख रुपयांची वित्तीय मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील कार्यान्वयन यंत्रणेकडून २८४ कोटी ३६ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आल्याने एकूण ४८२ कोटी ३६ लाखांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला. यावेळी मंत्री उईके यांनी गडचिरोली जिल्ह्यात अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.

गाव तेथे रस्ता – आदिवासी विकास मंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असल्याने येथील प्रत्येक गाव रस्त्याने जोडला जावा, यावर भर देण्याचे व ‘गाव तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम प्रस्तावित करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी बैठकीत दिले.

शिक्षणाला प्राधान्य – प्रत्येक विद्यार्थ्याला संधी

शाळा तसेच वसतीगृहांमध्ये प्रवेशाच्या सुविधा अधिक सुटसुटीत आणि सर्वसमावेशक करून आदिवासी समाजातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी उपाययोजनांवर भर देण्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळण्यासाठी  पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास यावर भर देवून महत्त्वाकांक्षी योजना आखण्याची गरज असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. 


या बैठकीला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल मीना (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (एटापल्ली) तसेच विविध कार्यकारी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आदिवासी वार्षिक उपयोजनेचा सविस्तर आढावा सादर केला. बैठकीत सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

Feb. 6, 2025   

PostImage

पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या …


पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा या क्षेत्राच्या माध्यमातून पुढे जान्याचा मार्ग आहे - डॉक्टर लुबना हकीम  

सुंदरनगर:-
पुस्तके वाचल्याने ज्ञान मिळते परंतू कला व क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या जीवनात पुढे जान्याचा मार्ग मीळतो असे मनोगत शाळेच्या क्रीडा व  सांस्कृतीक कार्यक्रम समारोपप्रसंगी  डॉ.लुबना हकीम  यांनी व्यक्त केले
 नेताजी सुभाषचंद्र प्राथमिक, माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, सुंदरनगर येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. सत्र 2024-2025 मध्ये शिक्षण विभागातर्फे राबवलेले विविध उपक्रम तसेच विद्यालयातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र, महागाव (ता. अहेरी) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. लुबना हकीम, राणी दुर्गावती विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक लोनबले, शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य पाल, प्रा. रॉय, स्वर्णकार , वांढरे , तसेच प्राचार्य निखुले उपस्थित होते.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा आदर्श ठेवत शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांचा जीवनात महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले.
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की,"केवळ पुस्तकांचे ज्ञानच नव्हे, तर कला, नाट्य, संगीत आणि खेळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व घडते.       ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळत आहेत, ते त्यांची मेहनत, समर्पण आणि जिद्द यामुळे मिळवत आहेत. परंतु प्रत्येक सहभाग देखील महत्त्वाचा असतो, कारण विजयापेक्षा मोठे असते, ते म्हणजे शिकण्याची वृत्ती आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द."त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा दाखला देत विद्यार्थ्यांना "मेहनत करा, सातत्य ठेवा आणि यश निश्चितच मिळेल" असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनाचे उत्तम आयोजनाबद्दल कौतुक केले.
यावेळी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.