प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणीवर केला वर्षभर अत्याचार,लग्नाची गळ घालताच प्रियकर झाला पसार
आरमोरी:-
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील एका तरुणाने प्रेमात अखंड बुडालेल्या तरुणावर वर्षभर अत्याचार तर केलाच परंतू तरुणीने लग्नाची गळ घालताच प्रियकर मात्र पसार झाला आहे
. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.
यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणा भाकासुद्धा घेतल्या होत्या मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला स्पष्टपणे नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा बोलावली मात्र निष्पन्न निघण्यासाठी तरुणाने बेजबाबदारपणा दाखविला त्यामुळे तळजोळ होऊ शकली नाही
तेव्हा वैतागून सदर पिडीत तरुणीने पोलीस स्टेशन गाठले.
नक्षल सप्ताहाच्या पूर्वसंध्येला, एका वरिष्ठ जहाल महिला माओवादी कॅडरने केले गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण
शासनाने जाहिर केले होते एकुण 08 लाख रूपयाचे बक्षिस.
माओवाद्यांच्या गडचिरोली विभागाला संपूर्ण साहित्य पुरविण्याची जबाबदारी तिच्यावर होती.
शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 671 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज दिनांक 27 जूलै 2024 रोजी जहाल महिला माओवादी नामे 1) रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता, कमांडर, टेलर टिम, गडचिरोली डिव्हीसी, वय 36 वर्ष, रा. बोटनफंुडी, ता. भामरागड, जि. गडचिरोली हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले.
सन 2007 पासुन सप्लाय टिम सदस्य म्हणुन काम करण्यास सुरुवात.
सन 2007-2008 मध्ये शिवणकला, कापड कटींंग व शिलाई मशिन चालविण्याचे प्रशिक्षण घेतले.
सन 2008-14 मध्ये टेलरींग टिममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती.
सन 2014 मध्ये टेलर टिममध्ये कमांडर पदावर बढती होऊन आजपर्यत कार्यरत
कार्यकाळात केलेले गुन्हे
चकमक -01
सन 2020 मध्ये मौजा पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
खून -01
सन 2019 मध्ये मौजा नैनवाडी जंगल परिसरात झालेल्या एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही.
गडचिरोली पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे.
खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
गडचिरोली जिल्ह्रात माओवाद्यांच्या तथाकथित क्रांतीने जनसमर्थन व आधार गमावला आहे.
महाराष्ट्र शासनाने रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन रिना बोर्रा नरोटे ऊर्फ ललीता हिला एकुण 5.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 23 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई श्री. संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, श्री. अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, श्री. नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व श्री. शंभु कुमार, कमांण्डट 09 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
बेरोजगार युवकांना भरघोस विद्यावेतनासह सहा महिने मिळणार अनुभवाची संधी.
▪️मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्ह्यात आतापर्यंत 510 मनुष्यबळाची मागणी तर 350 युवक-युवतींची नोंदणी
बारावी पास 6 हजार, आयटीआयसाठी 8 हजार, पदवीधर,पदव्युत्तर 10 हजार रूपये विद्यावेतन.
गडचिरोली,दि. २७: शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास, आयटीआय, पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
उमेदवारांनी विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयातील तसेच उद्योजकाकडील विविध पदावररील कामाचा अनुभव प्राप्त करण्यासाठी सहा महिन्याकरिता इंटर्नशीप म्हणून ज्युनिअर अकाऊंट ऑफिसर,ज्युनिअर इंजिनिअर,ज्युनिअर क्लर्क, असिस्टंट अकाऊंट आफिसर,प्राथमिक शिक्षक,माध्यमिक शिक्षक,डाटा एन्ट्री ऑपरेटर, संगणक ऑपरेटर या पदाकरिता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावे.
बारावी पास विद्यार्थ्यांना प्रतिमहा सहा हजार, आयटीआय/पदविका उत्तीर्ण युवकांना आठ हजार व पदविधर/पदव्युत्तर युवकांना दहा हजार असे भरघोस विद्यावेतन या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. हे विद्यावेतन प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने दरमहा राज्य शासनाकडून अदा केले जाईल. याव्यतिरिक्त उद्योगांकडूनही प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देण्याची मुभा असेल. प्रशिक्षणार्थी एका महिन्यात दहा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिले जाणार नाही. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के तर शासनाच्या शासकीय/निमशासकीय या आस्थापना/उद्योग/ महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत विविध आस्थापनांकडून ५१० मनुष्यबळाची मागणी नोंदविण्यात आली आहे तर ३५० उमेदवारांनी योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावर अर्ज केले आहेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. याचबरोबर उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्ष असावे. उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा. त्याची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खातेही आधारशी संलग्न असावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या आस्थापनांना पुढे यायचे आहे त्या आस्थापना/उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षापूर्वीची असावी. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास विभाग, बॅरेक क्रमांक 2, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, गडचिरोली येथे संपर्क साधावा असे कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कळविले आहे.
चक्क खाटेची कावड करून मुलाची चिखलातून 18 कि.मी. पायपीट
भामरागड तालुक्यातील दुर्गम भागातील वास्तव
भामरागड : - चक्क खाटेची कावड करून आपल्या वडीलास १८ की.मी. पायदळ जाऊन भामरागडच्या रुग्णालयात उपचार केले व पुन्हा त्याच पद्धतीने घरी सुद्धा पोहचविले हे आहे भामरागड तालुक्यातील वास्तव मात्र लोकप्रतिनिधीचे या बाबीकडे दुर्लक्ष होत आहे
शेतशिवारात शेतीचे काम करीत असताना घसरून पडल्याने जखमी झालेल्या पित्याला दवाखान्यात नेण्यासाठी कसल्याही प्रकारची सोय व वाहन उपलब्ध होत नसल्याने मुलाने मित्रांच्या मदतीने खाटेची कावड करुन चिखलात तब्बल 18 कि.मी. पायपीट केली. वाटेत नदी तुडूंब भरलेली होती, पण पितृ प्रेमही ओसंडून वाहत होते, त्यामुळे नावेतून नदी पार केल्यानंतर रुग्णालयात दाखल केले.
मालू केये मज्जी वय, 67 वर्ष, रा. भटपार ता. भामरागड जिल्हा, गडचिरोली असे जखमी पित्याचे नाव आहे.
जिल्ह्यात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरु आहे. त्याचा सर्वाधिक फटका भामरागड या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागाला बसला. पर्लकोटा नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने अद्यापही भामरागड शहराचा संपर्क तुटलेलाच आहे
पुसु मालू मज्जी व त्याचे मीत्र कावड घेऊन जातिअसतांना पामुलगौतम नदी तुडूंब भरुन वाहत होती, पण पुसू मालू मज्जी व त्याच्या मित्रांनी हिंमत न हारता नावेत खाट टाकून नदी पार केली. तेथून पुन्हा खाटेवरुनच त्यांनी मालू मज्जी यांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली, त्यानंतर एक्सरे काढला. यात त्यांचा पाय फ्रैक्चर असल्याचे निदान झाले. या प्रसंगानंतर पुत्रप्रेमाची तर चर्चा झालीच, पण अतिदुर्गम भागात पुरामुळे रुग्णांचे कसे हाल होत आहेत, हे देखील वास्तव यामुळे चव्हाट्यावर आले आहे या परिसरात विकासाचे आव आणणारे लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेऊन आहेत काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे दुर्गम भागातील आदिवासींचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत
मालू मज्जी यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. गडचिरोलीचा संपर्क तुटलेला असल्याने मुलगा पुसू मालू मज्जी हा निराश झाला. तात्पुरत्या उपचारानंतर वडिलांना घेऊन तो पुन्हा खाटेची कावड करुनच भटपार येथे घरी परतला.
Sarkari Yojana 2024: सणासुदीच्या दिवसात राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय व प्राधान्यक्रम रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. लाखांवर कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल, एक किलो चणाडाळ आदी साहित्य आहे. आता गणपती उत्सवादरम्यान लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरण केला जाणार आहे.
हे देखील वाचा : Sarkari Yojana 2024: बीज प्रक्रिया संचासाठी मिळणार 10 लाखांपर्यंत अनुदान
सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारे रेशन दुकानाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अन्नधान्य दिले जाते. याशिवाय सणासुदीच्या दिवसामध्ये राज्य शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरण केला जातो. केवळ शंभर रुपयांमध्ये रवा, साखर व चणाडाळ प्रत्येकी एक किलो आणि एक लिटर तेल दिले जाते. आता गणपती उत्सव साजरा करता यावा, याकरिता आनंदाचा शिधा अंत्योदय तसेच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्डधारक संख्येनुसार जिल्हा पुरवठा विभागाद्वारा मागणी नोंदविण्यात येत आहे.
या किटचा गोदामात पुरवठा झाल्यानंतर 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान संबंधित रेशन कार्डधारकांना वितरित करण्यात येणार आहे.
गौरी गणपतीनिमित्त 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यामध्ये अंत्योदय तसेच प्राधान्य गटातील कार्डधारकांना हा लाभ मिळणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान आनंदाचा शिधा वितरीत केला जाणार आहे.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना: रक्षाबंधन पर मिलेगा खास तोहफा
रक्षाबंधन के अवसर पर मध्य प्रदेश की लाखों लाड़ली बहनों के लिए एक खुशखबरी आई है। मुख्यमंत्री लाड़ली बहना योजना के अंतर्गत, इस साल 1 अगस्त 2024 को हर लाभार्थी के बैंक खाते में अतिरिक्त 250 रुपए ट्रांसफर किए जाएंगे। यह राशि उनकी नियमित 1250 रुपए प्रति माह की सहायता राशि के अलावा होगी, जो एक विशेष शगुन के रूप में दी जा रही है।
इस योजना की शुरुआत मई 2023 में हुई थी, और अब तक 14 किस्तें जारी की जा चुकी हैं। सरकार ने यह सुनिश्चित किया है कि रक्षाबंधन के अवसर पर 15वीं किस्त समय से पहले उपलब्ध कराई जाए, ताकि बहनों को त्योहार की खुशियों में और भी बढ़ावा मिल सके।
मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव ने हाल ही में "अग्रदूत पोर्टल" का उद्घाटन किया है। इस पोर्टल के माध्यम से सूचनाओं का प्रसार अधिक प्रभावी और त्वरित तरीके से किया जाएगा। इस पोर्टल के जरिए व्हाट्सएप पर मल्टीमीडिया मैसेज भेजे जाएंगे, जिससे लाभार्थियों को योजना की जानकारी सीधे उनके मोबाइल पर मिलेगी।
लाड़ली बहना योजना के तहत, 21 से 60 वर्ष की उम्र की विवाहित महिलाओं को लाभ मिलता है, जिनकी सालाना आय 2.5 लाख रुपए से कम है। यह योजना महिलाओं को सालाना 15,000 रुपए तक की सहायता प्रदान करती है। अगर आप इस योजना के तहत पात्र हैं, तो रक्षाबंधन के इस खास मौके पर आपको अतिरिक्त 250 रुपए का यह उपहार निश्चित रूप से खुशी का कारण बनेगा।
Gadchiroli News: गडचिरोली : जिल्हा पोलिस दलातर्फे 912 शिपाई पदांसाठी मैदानी परीक्षा पार पडल्यानंतर आता 28 जुलै रोजी सकाळी 8:00 वाजता लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी 11 केंद्रे निश्चित केली आहेत.
21 जून ते 23 जुलै या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. 912 पदांसाठी 28 हजार उमेदवारांनी अर्ज गुणांच्या आधारे लेखी परीक्षेसाठी केले होते. मैदानी चाचणीतील एकूण 6 हजार 711 उमेदवार पात्र झाले आहेत.
28 जुलै रोजी सामान्य अध्ययन या विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते दुपारी 12:00 यादरम्यान, तर दुसरा पेपर गोंडी व माडिया या विषयांवर दुपारी दीड ते 3:00 या वेळेत घेण्यात येणार आहे.
सर्व उमेदवारांनी आपले लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
1 | महिला महाविद्यालय, चंद्रपूर रोड गडचिरोली |
2 | फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, चंद्रपूर रोड, गडचिरोली |
3 | प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, आरमोरी रोड गडचिरोली |
4 | आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल, सेमाना रोड, गडचिरोली |
5 | कारमेल हायस्कूल, धानोरा रोड गडचिरोली |
6 | स्कूल ऑफ स्कॉलर्स, धानोरा रोड, गडचिरोली |
7 | शिवाजी हायस्कूल तथा विज्ञान महाविद्यालय, गोकुलनगर गडचिरोली |
8 | शिवाजी इंग्लिश ॲकॅडमी स्कूल, गोकुलनगर गडचिरोली |
9 | शासकीय कृषी महाविद्यालय, आयटीआय चौक, गडचिरोली |
10 | शासकीय विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी रोड, गडचिरोली |
11 | शिवाजी महाविद्यालय, धानोरा रोड गडचिरोली |
गडचिरोली शहरातील अशा एकूण 11 केंद्रांवर पोलिस शिपाई पदाची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांनी आपल्या परीक्षा केंद्रावर सकाळी 8:00 वाजता उपस्थित राहणे आवश्यक राहील.
टीप : सार्वत्रिक बहुउद्देशिय संस्था नवेगाव, गडचिरोली यांच्या कडून बाहेरून गडचिरोली मद्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था.
विद्यार्थ्यांनी आज 3 वाजताच्या आत आपले नावे कळवावे.
स्थळ: स्वप्नील मडावी अकॅडमी, इंदिरानगर गडचिरोली, सृष्टी मंगल कार्यालय,पटेल मंगल कार्यालय गडचिरोली.
अधिक माहितीसाठी संपर्क : सौ.जुमनाके मॅडम 9405872397, श्री स्वप्नील मडावी सर 9529933893 , श्री तुषार मडावी - 9422156584
Chandrapur News :- चंद्रपूर जिल्ह्यात आज दि, २७ जुलै शनिवारला मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, हवामान खात्याने Chandrapur जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उद्या शनिवारला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अश्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा :- Warora News :- वरोरा शहराला हादरे बसत आहे, काय आहे कारण ?
अधिक वाचा :- Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' जेरबंद
अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…
अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Warora News :- वरोरा शहरातील शिवाजी प्रभाग परिसरात जबरदस्त हादरे बसत असून या हाद-यामुळे सध्या कोणतीही जीवित व वित्तहानी झाली नसली तरी भविष्यात ही शक्यता नाकारता येत नाही. या हाद-यांनी मात्र लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र हे हादरे नेमके कशाचे याबद्दल नागरिकात संभ्रम आहे.
हे हादरे रोज हे अडीच ते तीनच्या दरम्यान बसत असतात. आज 23 जुलै रोज मंगळवारला स्नेहांकित नगर, ओमनगर, आंबेकर ले आऊट Warora या भागात तीन वाजून दहा मिनिटांनी बसलेला हादरा हा तर जास्त तीव्रतेचा होता. या हाद-यामुळे दरवाजे, खिडक्या व घरही हलायला लागते.
या हादऱ्यांमुळे घराला भेगा पडण्याची तसेच जीवहानी होण्याची शक्यता आहे. मात्र हे हादरे भूकंपाचे की अन्य कोणत्या कारणाचे हे नागरिकांना कळू शकत नाही.
Warora येथून सात किलोमीटर अंतरावर एकोणा येथे दगडी कोळश्याची खुली खाण आहे.
या WCL खाणीत ब्लास्टिंग केले जाते. या ब्लास्टिंग मुळे हे हादरे बसत असावे असे म्हटले जाते.परंतु वेकोली पदाधिकाऱ्यांनी आमच्या ब्लास्टिंगमुळे Warora शहरापर्यंत हादरे बसू शकत नाही असा दावा केला आहे.
मग या हाद-यांनी नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हा प्रश्न निर्माण होत आहे.
हे हादरे नेमके कशाचे हे तपासणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार हे ठरवता येऊ शकणार नाही.
म्हणून ब्लास्टिंगमुळे हे हादरे बसत असेल तर वेकोली प्रशासनाला शासकीय यंत्रणेने समज देणे गरजेचे आहे.
या हाद-यांमुळे भविष्यात घरांचे नुकसान होणे व एखाद्या वेळेस जीवहानी होणे असे धोके संभवू शकतात. यामुळे यावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.या हाद-यामुळे मात्र नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हे मात्र निश्चित.
अधिक वाचा :- Chandrapur News :- अखेर दोघा जणांचा बळी घेणारा तो ‘वाघ' जेरबंद
अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…
अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे या निरपराध इसमाची पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन माओवादयांनी हत्या केली.
गडचिरोली/(26): गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे व त्याची पत्नी रासो ऊर्फ देवे झुरु पुंगाटी हे दोघे सन 2007 पासुन भामरागड दलममध्ये सदस्य म्हणुन काम करीत होते. माओवादयांच्या तकलादु आणि खोटया क्रांतीची या दोघांना कल्पना आल्याने दोघांनी एकत्रीतपणे 07 जुलै 2017 रोजी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आणि हिंसेचा मार्ग सोडुन स्वत:च्या प्रगतीचा मार्ग स्विकारला होता. हे दाम्पत्य माओवादयांचा हिंसेचा खोटा आणि विनाशकारी मार्ग सोडुन शांततेचा मार्ग स्विकारत शेती करून आयुष्य जगत होते.
काल दि. 25 जुलै 2024 रोजी ते दिनांक 26 जुलै 2024 चे मध्यरात्री माओवादयांनी जग्गु ऊर्फ जयराम कोमटी गावडे याची आरेवाडा ते हिद्दुर रोडवरील PHC जवळ पोलीस खबरी असल्याच्या खोटया कारणावरुन हत्या केली. सदर हत्येप्रकरणी पोस्टे भामरागड येथे गुन्हा दाखल करण्यात येत असुन पुढील कायदेशीर कार्यवाही चालु आहे.तसेच भामरागड परिसरात माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे
Chandrapur News :- तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर येथील जनाबाई जनार्धन बागडे वय वर्ष ५१ या महिलेसह तर नागभीड तालुक्यातील मिंडाळा कोसंबी गवळी येथील शेतकरी दोडकू शेंदरे या दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला Tiger वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केले आहे.
त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. जेरबंद करण्यात आलेला वाघ हा टी-११५ या वाघिणीचा २० महिन्यांचा नर बछडा असल्याचे समोर आले आहे.
तळाेधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये टी-११५ या वाघिणीचा हा २० महिन्यांच्या बछड्याने चांगलीच धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेतला होता. नागभीड तालुक्यात २३ जुलै रोजी मिंडाळा कोसंबी गवळी रस्त्यालगतच्या दोडकू शेंदरे या शेतकऱ्यांचा आणि नवानगर येथे जनाबाई जनार्धन बागडे या महिलेचा बळी घेतला होता.
या वाघामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. सदरच्या वाघाला Tiger जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने नवानगर परिसरातील कक्ष क्रमांक १३२ मध्ये पिंजरे लावण्यात आले होते.
वनविभागाचे पथक वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होते. ताडोबाचे Tadoba वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए.सी.मराठे यांनी वाघाला Tiger बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून जेरबंद केलेले आहे.
यावेळी डॉ. खोब्रागडे यांनी वाघाची Tiger वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर वाघाला जेरबंद करून प्राणी बचाव केंद्रामध्ये नेण्यात आलेले आहे. धुमाकूळ घालून २ जणांच्या बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद केल्यामुळे परिसरातील नागिरकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
वाघाला जेरबंद करण्याची कारवाई डॉ. आर. एस. खोब्रागडे, शुटर ए. सी. मराठे, राकेश आहुजा (बायोलॉजिस्ट), दिपेश. डि. टेंभुर्णे, योगेश. डि. लाकडे, गुरुनानक. वि. ढोरे, वसीम. ऐन. शेख, विकाश. एस. ताजने, प्रफुल. एन. वाटगुरे, ए. डी. कोरपे, ए. एम. दांडेकर यांच्यासह जलद कृती दलाच्या पथकाने केली आहे.
Tadoba चे वैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी जिल्ह्यामध्ये झालेल्या मानव-वन्यजीव संघर्षांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. डॉ. खोब्रागडे यांनी आतापर्यंत ७० वाघांना Tiger यशस्वीरित्या जेरबंद केलेले आहे. विशेष वाघाला जेरबंद करतांना त्यांना हाताचा एक बोटसुध्दा गमवावा लागला आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…
अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
Today Horoscope :- २७ जुलै २०२४ ; मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल, प्रवासाची संभवता
मेष :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र बाराव्या स्थानात आहे. आज एकाग्रतेच्या अभावामुळे मन अस्वस्थ होईल. मानसिक तणाव जाणवेल. आर्थिक गुंतवणूक हुशारीने करावी कारण चुकीच्या गुंतवणुकीमुळे फारसा नफा मिळणार नाही. पुढे वाचा...
वृषभ :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून लाभात चंद्र स्थित आहे. आज तुम्हाला घर आणि मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. जुन्या पण बालपणीच्या मित्रांचा सहवास मनाला आनंद देईल. पुढे वाचा...
मिथुन :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र दहाव्या स्थानावर आहे. व्यवसायासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिकांना व्यवसायात वाढीबरोबरच यश मिळेल आणि उत्पन्न देखील मिळेल. पुढे वाचा...
कर्क :- शनिवार, 27 जुलै, 2024: चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र भाग्यस्थानात आहे. आजची सुरुवात मानसिक तणाव आणि अस्वस्थतेने होईल. पुढे वाचा...
सिंह :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र आठव्या घरात आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नैतिक विचारांवर नियंत्रण ठेवणे आणि बेकायदेशीर कामांपासून दूर राहणे उचित ठरेल. पुढे वाचा...
कन्या :- 27 जुलै 2024, शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र सातव्या स्थानावर आहे. आजची सकाळ मित्रांसोबत फिरण्यात, खाणे-पिणे आणि मनोरंजनात आनंदाने व्यतीत होईल. पुढे वाचा...
तुला :- आज, शनिवार, जुलै 27, 2024, चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र सहाव्या स्थानावर आहे. आज तुम्ही तुमच्या मजबूत मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. पुढे वाचा...
वृश्चिक :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र पाचव्या स्थानावर आहे. आज आपली भावनिक संवेदनशीलता वाढेल. मानसिक संतुलन साधावे लागेल. पुढे वाचा...
धनु :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र चौथ्या स्थानावर आहे. कौटुंबिक शांतता राखण्यासाठी आज अनावश्यक वाद टाळणे योग्य राहील. पुढे वाचा...
मकर :- 27 जुलै 2024 शनिवार चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र तिसऱ्या स्थानावर आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेताना सशक्त आणि स्थिर विचारसरणीला प्राधान्य द्यावे लागेल. मित्र आणि प्रियजनांच्या भेटीने तुम्ही आनंदी व्हाल. सहलीची योजना करा. अधिक वाचा...
कुंभ :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र दुसऱ्या स्थानावर आहे. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल कारण आज वाद आणि कटुता होण्याची शक्यता आहे. पुढे वाचा...
मीन :- 27 जुलै 2024 शनिवारचा चंद्र आज मीन राशीत आहे. आपल्या राशीतून चंद्र पहिल्या स्थानावर आहे. आज तुमच्या घरात काही शुभ कार्य घडतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.
अधिक वाचा :- Chandrapur News :- सायंकाळची वेळ, रस्त्यावर शुकशुकाट आणि शेतकऱ्या समोरासमोर वाघ उभा मग…
अधिक वाचा :- Today Horoscope :- २६ जुलै २०२४ ; नवीन कामात यश मिळेल, धनलाभ होईल
अधिक वाचा :- Today Horoscope :- २५ जुलै २०२४ ; सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल
अधिक वाचा :- Chandrapur News :- नगभिड तालुक्यांतील मिंडाळा गावात वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- राजुरा शहरात घडली गोळीबाराची घटना, एकच मृत्यू
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर - मूल मार्गावर दोन एसटी बस चा अपघात
अधिक वाचा :- Union Budget 2024 : क्या सस्ता होगा और क्या महंगा? यहां देखें पूरी सूची
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
गडचिरोली होमगार्ड भरती 2024
141 रिक्त पदांकरिता भरती सुरू
आजच ऑनलाईन अर्ज करा.
Home Gaurd Maharashtra Bharti महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यात 10 वी पास होमगार्ड पदांसाठी मेगा भरती त्यापैकी गडचिरोली होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे ही एक मेगा भरती आहे. आणि याच्यामध्ये 9700 एवढ्या जागा रिक्त आहेत.
देशातल्या जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मदत कार्याची कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडविणे होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो.
● काल २५ जुलै २०२४ पासून या भरतीची सुरुवात झालेली आहे तरी होमगार्ड नोकरीसाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी शारीरिक पात्रता चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मैदानी चाचणी आणि कागदपत्रे पडताळणी केली जाईल.
● या नोकरीसाठी उमेदवार ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याच जिल्यात नोकरी मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करणे गरजेचे नाही
ययाबाबत अर्ज प्रक्रिया २५ जुलै पासून सुरू झालेली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करायचं आहे.
राज्यात गृहरक्षक दलासाठी ५४ हजार जागा मंजूर आहेत. त्यापैकी 9700 जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी गडचिरोली जिल्ह्यात 141 रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
होमगार्ड नियमित देखभालीच्या अधीन नाहीत. मात्र, निवडणुका आणि सण-उत्सवादरम्यान अधिकाऱ्यांच्या संगनमताने त्यांची नियुक्ती केली जाते
700 प्रतिदिन आणि भेट भत्ता रु. सेटलमेंट कालावधी दरम्यान दररोज 100.
प्रशिक्षण कालावधी दरम्यान, 35 रुपये वैयक्तिक भत्ता आणि 100 रुपये निर्वाह भत्ता देखील दिला जातो.
90 रुपये साप्ताहिक ड्रिल भत्ता दिला जातो आणि होमगार्डमधील तीन वर्षांच्या सेवेच्या समाप्तीनंतर, पोलीस, वन विभाग आणि अग्निशमन दलातही पाच टक्के आरक्षणाची परवानगी आहे.
शैक्षणिक पात्रता : कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा
शारीरिक पात्रता: ; वय 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाचा आत उंची पुरुषांकरिता 162 सेंटीमीटर
आणि महिलांकरिता 150 सेंटीमीटर
छाती फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे.
https://maharashtracdhg.gov.in/
गडचिरोली होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु झालेली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 असेल.
पदाचे नाव – होमगार्ड
• पदसंख्या – 141 जागा
• शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.)
• नोकरी ठिकाण – गडचिरोली
• वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
• अर्ज पद्धती – ऑनलाईन
• अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 जुलै 2024
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024
• अधिकृत वेबसाईट –
https://maharashtracdhg.gov.in/
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
गडचिरोली, ब्यूरो. लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकरण आरमोरी येथे समोर आले आहे. हा प्रकार मागील दीड वर्षांपासून सुरू असल्याचे उघड झाले आहे. जेव्हा या तरुणाने लग्नाला नकार दिला. तेव्हा या पीडित तरुणीने आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून, आरोपी फरार आहे. शुभम बबन सोरते (वय 27, रा. आरमोरी-बर्डी) असे फरार आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभमची मागील दीड वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक) माध्यमातून लगतच्या जिल्ह्यातील एका तालुक्यातील 21 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये होऊन नंतर प्रेम जुळले.
यातूनच त्यांच्यात सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीची 2023 मध्ये सोशल
मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. 2023 पासून ते मे 2024 पर्यंत सुरू असलेल्या प्रेमादरम्यान त्यांनी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तत्पूर्वी या दोघांनी प्रेमाच्या व लग्नाच्या आणाभाकासुद्धा खाल्ल्या. मे 2024 नंतर सदर तरुणी ही 21 वर्षांची होताच फिर्यादी तरुणीने लग्न करण्यासाठी शुभम सोरते याच्याकडे आग्रह धरला. मात्र, शुभमने लग्नाला नकार दिला. सदर तरुणीने दोनदा तडजोडीअंती दोन्ही घरच्यांच्या मंडळींची सभा लावली.
मात्र, शुभमचा लग्नाला विरोध कायम होता. पीडित तरुणीने 24 जुलैला आरमोरी पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलिसांनी आरोपी शुभम सोरते याच्या विरोधात भादंवी कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार असून, आरमोरी पोलिसांद्वारे त्याचा शोध सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विनोद रहांगडाले यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता मसराम करीत आहेत.
'महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद
2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट
गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती
गडचिरोली,दि.(26): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
गडचिरोली/ (27):- गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली विभाग अंतर्गत "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने" यशस्वी आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन केली लाडक्या बहिणीच्या मदतीला
6 बिट आणि दोन सुपरवासझर सांभाडतात काम
अतिश्रम काम करताना दिसत आहेत. अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ब-याच ठिकाणी नेटवर्कची समस्या येत आहे. यामुळे पंचायत समिती गडचिरोली
सौ एस व्ही गाडगे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली पंचायत समिती गडचिरोली श्रीमती आशा वरंघटे विस्तार अधिकारी , श्री मस्के शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे.
[7/26, 2:56 PM] Mandeep Goradwar: गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228 यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.
Kamthi News: कामठी: प्रेमसंबंधातून तरुणीसोबत वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ब्रेकअपनंतर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याने प्रकरण पोलिसांत पोहोचले आणि पोलिसांनी आरोपीस अटक केली. हा प्रकार कामठी शहरात नुकताच घडला.
शुभम अनिल नितनवरे (22, रा. विदूतबाबानगर, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुभम व कामठी शहरांतील विदूतबाबा नगरात राहणारी 22 वर्षीय तरुणी पुणे शहरातील खासगी कंपनीत नोकरीला होते. तिथेच त्यांची आपसांत ओळख व पुढे घट्ट मैत्री झाली. त्यामुळे दोघेही काहीकाळ एकाच खोलीत वास्तव्याला होते.
या काळात त्याने तिच्याशी वारंवार शरीरसंबंधही प्रस्थापित केले. शुभमने मोबाइल फोनने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते तर काही व्हिडीओ क्लिप तयार केल्या होत्या. या प्रेमसंबंधाविषयी दोघांच्याही कुटुंबीयांना माहिती होती. मे 2024 मध्ये मतभेद निर्माण झाल्याने त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे तरुणीच्या भावासोबत शुभमचा वादही उदभवला होता.
दोघेही एकमेकांच्या विरोधात तक्रार नोंदविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तक्रार दाखल न करता निघून आले. त्यानंतर शुभमने तिचे आक्षेपार्ह फोटो टेलिग्रामवर व्हायरल केले. त्यामुळे तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 74, आयटी अॅक्ट सहकलम 67, 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद पोरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सचिन यादव व दीप्ती मोटघरे करीत आहेत.
आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ
गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.
नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.
विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.
नागपूर सावनेर :
सावनेर पोलीस यांच्या माहितीनुसार
विषप्राशन करून मृतक:राजुभाउ गजभिये यांनी जीवनयात्रा
संपविली, मूकबधिर शाळेजवळ वॉर्ड no ३ येथील रहिवाशी
पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील घटना
रात्री ११.३० चे दरम्यान
त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉ. यांनी मृत
घोषित केले.
टीप......
.रात्रीच वेळी मृतदेह मारचूरी मध्ये घेउन जातांना वाढलेले गवत
धोकादायक बसून येथे रात्री बे रात्री पोलिसांना ambulece
वाले, नातेवाईक, यांचा जीवाला धोका नाकारता येतं नाहीं
अशीच एक घटना काल रात्रीच वेळी राजू गजभिये याचा मृतदेह
शवाविच्छेदन ब करण्याकरता मृतदेह रात्री ठेवत
असताना,गाडीतून उतरताना गवतावर पाय ठेवला असता,
सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच पायावरून धामण
जातीचा बिनविषारी साप गेला, त्याचं ठिकाणी विषारी साप
असता तर जीवावर बेतली असती, नगरपरिषद प्रशासनाने तिथे
वाढलेला गवत पूर्णपणे साफसफाई करण्यात यावी पुढील
तपास सावनेर पोलीस यंत्रणा करीत आहे
नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले
गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली
गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते. त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून त्यांना आल्या पावली परत जावे लागले
आता आप्पती व्यवस्थापन DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते.
मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत