PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद 2 दिवसांत 2 …


 

'महाज्योती’च्या योजनांचा क्यूआर कोड स्कॅनरला उत्स्फूर्त प्रतिसाद
 2 दिवसांत 2 लाख विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर दिली भेट
 गरजू विद्यार्थ्यांनी विविध योजनांची जाणून घेतली माहिती

 गडचिरोली,दि.(26): राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त असलेली महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही मूल्याधिष्ठ शिक्षणाचा प्रसार ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी काम करीत आहे. महाज्योती द्वारे एमएचटी-सीईटी, जेईई, नीट, संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी), पायलट ट्रेनिंग, पीएचडी स्कील डेवलपमेंट आदिंचे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत असल्यानेच आज राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी उतुंग यश प्राप्त केले आहे.
राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या विविध योजनांची माहिती पोहचण्याकरिता www.mahajyoti.org.in हे संकेतस्थळ तयार केले आहे. महाज्योतीच्या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना जलद आणि सोप्या पद्धतीने पोहचण्याच्या उद्देशाने संस्थेने 24 जुलै रोजी मोबाईलचे क्यूआर कोड स्कॅनर तयार केले. अत्याधुनिक असलेले यास्कॅनर कोडवर असलेल्या संकेतस्थळावर https://mahajyoti.org.in/schemes/ 2 लाखांच्यावर विद्यार्थ्यांनी भेट घेत विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश खवले यांनी सांगितले की, राज्यातील ओबीसी, व्हिजेएनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून दर्जेदार प्रशिक्षण तसेच विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य संस्था करीत आहे. महाज्योतीद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्यामुळे महाज्योतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती ही एक क्लिक वर प्राप्त व्हावी याकरिता स्कॅनर कोड तयार करण्यात आले असून दोन दिवसांत 2 लाखांचा टप्पा संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी गाठला आहे. यामुळे महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आज उत्सूकतेने संस्थेच्या संकेतस्थळाला भेट देत असून ही अभिमानास्पद बाब आहे, असल्याचा विश्वास श्री. राजेश खवले यांनी व्यक्त केले. महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री मा. श्री. अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत तयार केलेल्या स्कॅनर कोड द्वारे संकेतस्थळाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
                                                                     


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा …


 

गडचिरोली पंचायत प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन लाडक्या बहिणीच्या मदतीला
 

   गडचिरोली/ (27):- गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  विभाग अंतर्गत "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने" यशस्वी आँनलाईन 9867 अर्ज, 23228 आफलाईन अर्ज यशस्वी करुन केली लाडक्या बहिणीच्या मदतीला
6 बिट आणि दोन सुपरवासझर सांभाडतात काम
 अतिश्रम काम करताना दिसत आहेत. अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲप द्वारे अर्ज भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ब-याच ठिकाणी नेटवर्कची समस्या येत आहे. यामुळे पंचायत समिती गडचिरोली  
सौ एस व्ही गाडगे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना गडचिरोली  पंचायत समिती गडचिरोली श्रीमती आशा वरंघटे विस्तार अधिकारी , श्री मस्के शिपाई इत्यादी कर्मचाऱ्यांवर भार पडत आहे.
[7/26, 2:56 PM] Mandeep Goradwar: गडचिरोली पंचायत समिती येथील प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मध्ये ऑनलाईन 9867 व ऑफलाईन 23228  यशस्वीपणे अर्ज भरून लाडक्या बहिणीला केली मदत.


PostImage

P10NEWS

Yesterday   

PostImage

SOCIAL MOVEMENTS: नाल्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या तिघांचे जीवाचा धोका पत्करून …


 

 शॉर्टकटने ओढवले संकट

पाणी वाहत असताना पुलावरून वाहन टाकू नये-जिल्हाधिकारी यांचे पुन्हा आवाहन*

गडचिरोली दि. २५ : नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना गडचिरोलीहून नागपूरला जाणाऱ्या  तिघांवर प्राण गमावण्याची वेळ आली होती. परंतु ही बाब स्थानिक नागरिक व आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळताच त्यांनी तत्परता दाखवून संबंधित तीघांचे प्राण वाचवले. याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने यांनी संबंधित नागरिकांचे विशेष कौतुक केले आहे.

आज दिनांक 25 जुलै ला मौजा चुरचुरा माल येथे  चुरचुरा-नवरगाव रस्त्यावरील नालावरील पाणी वाहत असताना नागपूर येथील रहिवासी राहुल किशोर मेंढे वय 32वर्ष, आशा किशोर मेंढे वय 65 व त्याचा भाचा दत्तश्री शरद गोडे वय 12 वर्ष  हे तिघे आपल्या दुचाकीने गडचिरोली वरून नागपूर ला जाताना नाल्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अडकून काही अंतरावर वाहत गेले. त्याच वेळी त्यांनी गावातील जवळ असलेल्या लोकांना हाक दिल्याने चुरचुरा येथील तैराक अनिल वामन गेडाम व त्यांचे इतर सहकारी *यांनी जीवाची पर्वा न करता* त्या तिघांचे प्राण वाचविले. त्यानंतर जिल्हा पथके, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गडचिरोली ची चमू तहसीलदार हेमंत मोहरे, मंडळ अधिकारी रुपेश गोरेवार, तलाठी श्रीमती भुरसे  यांनी त्यांना गावात आणून कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, CHO, आशा स्वयंसेवक, आपदा मित्र, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या उपस्थितीत  त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व त्यांना  गडचिरोली येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले.

 ही घटना मौजा  आज सायंकाळच्या सुमारास 7 ते 8 दरम्यान घडली.  यात मोटरसायकल पुरात वाहून गेली आहे.

पुलावरून पाणी वाहत असताना कोणतेही वाहन टाकू नये अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहे. या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपल्या जीव नाहक धोक्यात घालू नये व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यातुन मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजने’चे दोन लाख अर्ज …


 

     

      गडचिरोली, दि.२५ : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत  गडचिरोली जिल्ह्यातून आतापर्यत २ लाख ६५९ महिलांनी अर्ज सादर केले आहे. 

 या योजनेसाठी ग्रामीण भागातून १ लाख ७९ हजार ७३१ तर शहरी भागातून २० हजार ९२८ अर्ज प्राप्त झाले आहेत.   तालुकानिहाय अर्ज नोंदणीची संख्या  पुढीलप्रमाणे आहे. अहेरी-१०७०३, आरमोरी-११३१२, भामरागड-६६०५, चार्मोशी-३८००४, देसाईगंज-१२९३६, धानोरा-२२७८६, एटापल्ली-१६३७२, गडचिरोली-२९२४२, कोरची-९७४२, कुरखेडा-१६३१३, मुलचेरा-१२४११, सिरोंचा-१४२३३. 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. 

 


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी …


गडचिरोलीच्या सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी 

    विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी
    10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन
  
       गडचिरोली/नागपूर दि.25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.  
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
    धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. 
    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक आहे. 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. 
00000


PostImage

P10NEWS

July 25, 2024   

PostImage

ZP TEACHER BHARTI : पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी …


 

गडचिरोली दि. २३ : जिल्हयातील पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या  शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागवुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गटशिक्षणाधिका-यांना दिले आहेत.

जुलै महिन्यात शाळा नियमित सुरु झाल्या मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात
रिक्त असल्याने विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रियेस विलंब होत असल्याने पवित्र प्रणालीमार्फत नियमित
शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण
संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवा निवृत शिक्षकांमधून कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा
परिषद शाळांतील पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकीय पदे  भरण्याबाबत शासनाने निर्देशित केले आहे.
त्यानुसार  निवृत्ती वेतन घेत असलेल्या अथवा  संबंधित तालुक्यात कायमस्वरुपी रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक / पदविधर शिक्षक / उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे कंत्राटी तत्वावर अध्यापन करण्यास इच्छूक असल्यास त्यांचेकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सेवानिवृत्त शिक्षकांमधून पदे उपलब्ध न झाल्यास अहर्ताप्राप्त सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांमधून हे पदे भरण्यात येतील. अर्जाचा नमुना जिल्हा परिषदेच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व सर्व पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असल्याचे  त्यांनी कळविले आहे.


PostImage

MH 33 NEWS

July 22, 2024   

PostImage

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे - लहुजी क्रांती …


 

गडचिरोली :- लहुजी क्रांती मोर्चा जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने   जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री  यांना निवेदन देण्यात आले . हे निवेदन महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात एकाच दिवशी देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावे .देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत  त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे साहित्य जगातील २७ भाषेमध्ये प्रकाशित झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्यांनी साता समुद्रापलीकडे गायन केला आहे .त्यामुळे १ ऑगस्टला त्यांच्या जयंती दिनानिमित्त मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यावे . १ ऑगस्टला सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावे .अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी  निधी उपलब्ध करून देण्यात यावे. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्जदारांसाठी जाचक अटी शिथिल करावे. त्यांच्या समाधीचा जीर्णोद्धार लवकरात लवकर निकाली काढावे .मातंग व तत्सम जातीवरील होत असलेले अन्याय व अत्याचाराच्या घटनाचा तपास एसआयटीकडे देऊन खटले फास्टट्रॅक कोर्टात चालवावे.
   या मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले. निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर बावणे , भोजराज काणेकर , प्रमोद बांबोळे ,प्राध्यापक राजेंद्र लांजेकर ,आनंद अलोणे, यज्ञराज जनबंधू उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 22, 2024   

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : मंगळवार २२ जुलै उद्या चार दिवस …


 

 

गडचिरोली/२२:- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने  यांनी २३ जुलै रोजी मंगळवारला हवामान खात्याच्या सुचना व जिल्ह्यातील सततच्या चार दिवस मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील पुर परिस्थिती आढावा आपत्ती व्यवस्थापन समिती द्वारे घेतला असता जिल्ह्यातील वैनगंगा, इंद्रावती, गोदावरी , प्राणहिता,बांडिया इ. नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असून पाणलोट क्षेत्र व नाल्यांना पुर आल्याने ३३ मार्ग बंद आहे. तसेच गोसिखुर्द धरणाचं विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय संस्था शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. २३ जुलै रोजी मंगळवारला सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.


PostImage

P10NEWS

July 22, 2024   

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व सरकारी व खाजगी …


            

 

 

 गडचिरोली/(२१) :- गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आपल्या आपत्ती व्यवस्थापन समिती द्वारे क्र १व क्रं. २ अधिककराचा वापर करून जिल्ह्यातील सततच्या मुसळधार पावसामुळे एकुण ३७ मार्ग बंद असल्यामुळे व गोसिखुर्द धरणाचं विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे धोक्याची परिस्थिती पाहता दिनांक २२ जुलै रोजी सोमवारला जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा,महाविद्यालय सर्व शासकीय व निमशासकीय संस्था, शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जाहीर केले आहे. तरी सर्व पालक व विद्यार्थी, संस्थापक व प्राचार्य यांनी दक्षता घ्यावी.


PostImage

P10NEWS

July 21, 2024   

PostImage

COLLECTOR SANJAY DAINE : पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड नागरिकांशी संवाद


 

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड
•    नागरिकांशी संवाद 
•    प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना

 

गडचिरोली दि. २० : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले.
जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, वडसा, कुरखेडा तालुक्यात भेट दिली.  त्यांनी यावेळी नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधला. नागरिकांनी काळजी घ्यावी, पूलावर पाणी वाहत असतांना घाईगडबडीत पूल ओलांडू नये, विजा चमकत असतांना झाडाखाली उभे राहू नये, मानवी चुकांमुळे कोणतीही जिवीत व वित्त हानी होवू नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय यंत्रणेला परिस्थितीवर बारीक नजर ठेवून अलर्ट राहण्याचे व नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना नियमितपणे राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्ह्यात कालपासून तीन दिवसाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसेच गोसेखुर्द धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात येणार असल्याची सूचना मिळाली होती. यासोबतच कालपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण होवून वाहतूकीचे अनेक मार्ग काही काळ बंद झाले, काही ठिकाणी नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले तर काही ठिकाणी रस्त्यावरील मुरूम व गिट्टी वाहून गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी यांनी त्वरीत दखल घेवून आज पाउस सुरू असतांनाच या भागांना भेट देवून पाहणी केली.
जिल्हाधिकारी संजय दैने यांचेसमवेत उपजिल्हाधिकारी विवेक साळुंखे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे कृष्णा रेड्डी, निलेश तेलतुंबडे, संबंधीत तहसिलदार, पोलिस अधिकारी, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक आपदा मित्र व नागरिक मदत कार्यासाठी उपस्थित होते. 
००००


PostImage

P10NEWS

July 20, 2024   

PostImage

CORRUPT CONSTRUCTION : भामरागड ते आरेवाडा रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ …


 

        कंत्राटदारांची चौकशी करण्याची माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांची माहिती!

अहेरी : विधानसभा क्षेत्रांतर्गत असलेल्या भामरागड तालुक्यातील भामरागड ते आरेवाडा रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असून पहिल्याच पावसात पूल वाहून गेले.याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसनेते  व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे. 

भामरागड तालुक्यात अनेक विकास कामे होत आहेत.छोट्या मोठ्या नाल्यावर नव्याने पूल बांधण्यात येत आहे.मात्र भामरागड ते आरेवाडा मार्गावर असलेल्या एका नाल्यावर काही महिन्यापूर्वी बांधण्यात आले.सदर पूल पहिलाच पावसात वाहून गेल्याचे दिसत आहे.सदर पूला लगतचा मलबा पहिल्याच पावसात खचलेला आहे त्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे. 

पहिल्याच पावसात पुलाची अशी दयनीय अवस्था झाल्याने सदर पुलाचे काम कितपत चांगले आहे सदर कामाचा दर्जा हा आता दिसून येत आहे. सदर बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आहे.


PostImage

P10NEWS

July 20, 2024   

PostImage

AAROGYA SUVIDHA PROBLEM : भामरागड तालुक्यातील गर्भवती महिलेला जेसीबीच्या सहाय्याने …


 

    अपर्ण पुलाचे बांधकाम रस्ता गेला वाहून लाडकी गर्भवती बहिण समस्येत चक्क जेसीबीच्या सहाय्याने नाला पार !

गडचिरोली/ 20 : राज्यभरात 'लाडकी बहीण योजने'चा उदोउदो सुरु असतांना गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातून एका गर्भवती महिलेचा धक्कदायक व्हिडीओ समोर आला आहे. रस्ता वाहून गेला,आलापल्ली-भामरागड रस्त्यावरील कुडकेली जवळून वाहणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तेथे वळणरस्ता देण्यात आला होता. मात्र, सध्या पावसामुळे नाल्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्याने कंत्राटदारांनी बनवलेला वळणमार्ग वाहून गेला..येथील महिलेला प्रसूतीकळा सुरु झाल्याने तिला दवाखान्यात भरती करण्याची गरज होती पण रस्ता नसल्याने महिलेला जेसीबीच्या बकेटमधन नाला पार करावा लागला...👆


PostImage

P10NEWS

July 20, 2024   

PostImage

WATER FLOWING : पर्लकोटा नंदी भामरागड. पुलावरून पाणी वाहने सुरु …


पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.20.7.2024

 

1) आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
2) अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता. अहेरी 
3) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा
4) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी
5.)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा
6) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा
7) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता. वडसा
8) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा 
9) करवाफा पोटेगाव रस्ता
10)मालेवाडा खोब्रामेंढा रस्ता ता. कुरखेडा 
11,) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा 
12) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज
13) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला
14)आलापल्ली – भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

पूर परिस्थिती संदर्भातील अहवाल
जिल्हा- गडचिरोली
दिनांक 20.07.2024, वेळ सकाळी 10.00 वा.
-----
 अ) पर्जन्यमान (मि.मी.) मध्ये:
आज दि. 20 जुलै, 2024 चे सकाळी 8.30 वाजता  Manual rain gauge station चे नोंदीनुसार जिल्ह्यात एकूण  सरासरी 79.2 मि.मी.  पाऊस झालेला आहे,  40 पैकी 23 मंडळामध्ये अतिवृष्टी ची नोंद झालेली असुन धानोरा तालुक्यातील मुरुमगाव मंडळमध्ये सर्वाधिक 156.4 मि.मी. पावसाची नोंद आहे.
    
 ब) धरण पाणी साठा व विसर्ग :
 1. वैनगंगा नदी :
🟠•     गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 27 गेट उघडलेले असुन 3,033 क्युमेक्स (1,07,114 क्युसेक्स) विसर्ग आहे. 
•    चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 3,804 क्युमेक्स (1,34,345 क्युसेक्स) आहे. गोसीखुर्द धरणातील विसर्ग 5,000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे.
•    वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वैनगंगा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली  आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 2. वर्धा नदी :
•    निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी सर्व 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे. 
•    बामणी (बल्हारशा) व सिरपूर टाऊन या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार वर्धा नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 3. प्राणहिता नदी :
•    दिना प्रकल्प 85 टक्के भरलेला असून सांडव्यावरुन विसर्ग निरंक आहे.
•    महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

 4. गोदावरी नदी :
•    श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे 62 पैकी 62 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
•      लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा)  चे 85 पैकी 85 गेट उघडलेले असुन विसर्ग 10,576 क्युमेक्स (3,73,500 क्युसेक्स) आहे. बॅरेज ची पाणी पातळी 93.00 मी. असुन पूर्ण संचय पातळीच्या 7.00 मी. ने खाली आहे.   
🟠•    कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार गोदावरी नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 3.0 मीटरने खाली आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.

  5. इंद्रावती नदी :
🟠•    जगदलपूर या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या 0.10 मीटरने खाली  आहे. 
•    चिंदनार, तुमनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी *इशारा पातळीच्या खाली* आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.
•    पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी 9.30 वाजताच्या नोंदीनुसार  इशारा पातळीच्या खाली  आहे. नदीची पाणी पातळी वाढत आहे.
     ---  
  🔴इशारा :
           नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक नद्या व नाले, तसेच वैनगंगा, प्राणहिता, वर्धा, गोदावरी व इंद्रावती या मुख्य नद्यांची *पाणी पातळी वाढण्याची शक्यता* आहे. तसेच हवामान विभागातर्फे जिल्हयात काही ठिकाणी *फ्लॅश फ्लड रिस्क* चे संकेत दिलेले असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी, तसेच नदी पात्रात आवागमन करु नये. 
--- 
 🔴हवामान संदेश :
           भारतीय हवामान विभागाचे नागपूर, भोपाल, रायपूर व हैद्राबाद केंद्र यांचे दिनांक 19.07.2024 रोजीच्या पर्जन्यमान इशारा संदेशानुसार वैनगंगा-प्राणहिता, वर्धा, इंद्रावती व मध्य गोदावरी या उपखोऱ्यातील काही भागात पुढील 24 तासाकरीता *मुसळधार ते अतिमुसळधार* स्वरुपाच्या पाऊसाची शक्यता असल्याचे संकेत दिलेले आहे. 
🟠तसेच गडचिरोली जिल्हयात 24 तासाकरीता पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट  दिलेला असून काही ठिकाणी 🔴फ्लॅश फ्लड रिस्क चे संकेत दिलेले असल्याने कृपया उचित दक्षता घ्यावी.


PostImage

P10NEWS

July 19, 2024   

PostImage

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" अधिकृत केंद्रावरीलच अर्ज ग्राह्य


 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
अधिकृत केंद्रावरीलच अर्ज ग्राह्य.                                                   

राजकीय व सामाजिक संघटना द्वारे आयोजित केलेले कॅम्प ग्राहित धरले जाणार नाही. अशा ठिकाणी केलेले अर्ज रद्द झाल्यास प्रशासनाची जबाबदारी नाही. 

गडचिरोली दि. १८ : जिल्ह्यातील काही राजकीय व सामाजिक संघटना कॅम्प आयोजित करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अर्ज भरून देण्यासाठी सदर संघटनांकडून पैशाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चुकीचा अर्ज भरल्यास अथवा अर्ज शासनाकडे सबमिट न झाल्यास संबंधित पात्र महिला लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग व संबंधीत अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पात्र महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आपले अर्ज शासनाने प्राधिकृत केलेल्या अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र या अधिकृत केंद्रावरच भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. या योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये अशा सूचना देतांनाच अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


PostImage

P10NEWS

July 18, 2024   

PostImage

गडचिरोली पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक, १२ माओवाद्यांना कंठस्नान …


 

NAXAL ATTACK :   गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक.
 

 12 माओवाद्याना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश .
 अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त.
 

     गडचिरोली/१७:- छत्तीसगढ सीमेजवळील  वांडोली गावात 12-15 माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी 10 वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-60 पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.


त्यावेळी सदर परिसरात  दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 06 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता.  त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात  आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.  तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.  मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा  प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम @ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.

 C-60 चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले  आहेत .  ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे.

माननीय श्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली यांनी वरील यशस्वी मोठ्या अभियानासाठी  C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.


PostImage

P10NEWS

July 16, 2024   

PostImage

पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ


 

 PMFBY :  पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

 

मुंबई, दि.१५ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याची आज दि. १५ जुलै ही अंतिम मुदत होती. मात्र, राज्यातील अनेक शेतकरी अद्यापही पीक विमा भरण्यापासून वंचित असल्याने त्यांना संधी मिळावी, यासाठी पीक विमा भरण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर ही मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली.                     सध्या राज्यात विविध योजनांसाठी लाभार्थींची सामूहिक सुविधा (CSC) केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना व लागणारे कागदपत्रे जोडताना सर्व्हरची गती मंद झाली आहे. अद्यापही अनेक शेतकरी विमा योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे पीक विम्याचे अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पत्र व्यवहार करण्यात आला होता. याबाबत मंत्री श्री. मुंडे स्वतः  पाठपुरावा करत होते.

            त्यानुसार आज सायंकाळी एक रुपयात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवण्यात आली. याबद्दल कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगवरुन केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. दरम्यान या पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी केले आहे.


PostImage

P10NEWS

July 11, 2024   

PostImage

कॅबिनेट मंत्री धर्मेरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थकांनी काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश!


कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे कट्टर समर्थकांनी काँग्रेस पक्षात पक्षाप्रवेश !                                                 

अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा अजित पवार गटाचे विद्यमान आमदार व महाराट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे खंदे व कट्टर समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला नेत्यांनी तसेच स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पाक्ष प्रवेश केली.त्यावेळी पक्षाप्रवेश ग्रामपंचायत सदस्य सौ.माया प्रकाश कोरेत,सौं.शाहीजीदार रुस्तमाखाॅ पठाण,किशोर सडमेक,प्रकाश कोरेत,सतीश कोरेत,संजू आत्राम,जागपती सडमेक,साईनाथ उरेते,तिरुपती सडमेक,पत्रू पोच्या आत्राम,सुरेश आलम,दिलीप आत्राम,दौलत उरेते,अमोल आत्राम,मनोज सडमेक,प्रभाकर आत्राम,बबूराव मडावीसह अहेरी विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे मुळे त्यांच्या पक्षाला राम राम करीत.महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षा नेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार व खासदार डॉ.नामदेव किरसान साहेबांचा नेतृत्वावर - काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे निरीक्षक व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार व आदिवासी काँग्रेससेलचे जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केले.सदर पक्षाप्रवेश कार्यक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या अहेरी येथील निवास्थानी घेण्यात आली आहे.काँग्रेस पक्षात पक्षाप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची ना.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेव किरसान साहेब,काँग्रेसनेते अजयभाऊ कंकडालवार,जिल्हा अध्यक्ष हनमंतू मडावी यांच्या हस्ते शाल व पक्षाचे दुप्पटा टाकून पक्षात स्वागत केले आहे.यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील समस्त काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

P10NEWS

July 11, 2024   

PostImage

LOYLD METAL SOCIAL WORK : नगरपंचायत एटापल्ली येथे बस व …


SOCIAL NEWS : नगरपंचायत एटापल्ली येथे बस व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न.

गडचिरोली/10 :- लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या वतीने एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील शाळकरी विद्यार्थ्यांन करिता दिलेले बस व एटापल्ली तालुक्यातील नागरिकांना वेळीच उपचार मिळण्याकरिता रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा नगरपंचायत एटापल्ली तर्फे नगरपंचायतीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.सदर बस व रुग्णवाहिकेचे लोकार्पण मा.दिपयंती पेंदाम नगराध्यक्षा नगरपंचायत एटापल्ली व मा.एस.व्यंकटेश्वर व्यवस्थापकीय संचालक लॉयड मेटल्स कंपनी यांच्या हस्ते झाले.लोकार्पण सोहळ्या नंतर उपस्तीत प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा.एस.व्यंकटेश्वर व्यवस्थापकीय संचालक लॉयड मेटल्स कंपनी यांनी उपस्तीत नागरिकांना मार्गदर्शन करताना म्हणाले आम्ही एटापल्लीच्या शाळकरी विद्यार्थ्यांना बस दिले,रुग्णांना वेळीच उपचार मिळावा याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करून दिले,लायड मेटल्स कंपनीचे प्रेम एटापल्ली करांवर आहे हे यामुळे शक्य झाले असे त्यांनी म्हणाले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.जितेंद्र टिकले नगरसेवक यांनी लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे व उपस्तीत प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा.चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली,मा.घागुर्डे साहेब तहसीलदार एटापल्ली, मा.आदीनाथ आंधळे गटविकास अधिकारी एटापल्ली, मा.निलिमा खोब्रागडे वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली, मा.ऋषिकेश बुरडकर गटशिक्षण अधिकारी, मा.साईकुमार सर, मा.बलराम सोमनानी, मा.राघवेंद्र सुल्वावार बांधकाम सभापती नगरपंचायत एटापल्ली, मा.नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती, जितेंद्र टिकले नगरसेवक, राहुल कुळमेथे नगरसेवक, निजान पेंदाम नगरसेवक, निर्मला कोंडबत्तुलवार नगरसेविका, निर्मला हिचामी नगरसेविका तसेच विद्यार्थ्यांचे पालकवर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


PostImage

P10NEWS

July 10, 2024   

PostImage

बसपा पदाधिकार्यांनी विद्यापीठाच्या प्र - कुलगुरुंना धरले धारेवर


PH.D CORRUPTION : बहुजन समाज पार्टी गडचिरोली पदाधिकार्यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील Ph. D. घोटाळा व विद्यार्थीयांच्या समस्या वर प्र-कुलगुरु श्रीराम कावळे यांना धरले धारेवर 

            गडचिरोली/ 08:- बहुजन समाज पार्टी गडचिरोली विधानसभा श्रेत्रामधील कार्यकरते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील प्र-कुलगुरु श्रीराम कावळे यांची भेट घेतली,यावेळी चर्चेमध्ये विद्यापीठ मधील दोन विद्यार्थीयांचे थिसिस जमा केल्यानंतर RRC द्वारा अवैध कार्य झाल्याचा मुद्दा उचलला.महाराष्ट्र सार्वजनिक कायद्याचे उल्लंघन समितिने केलेले आहे.तरी या प्रकरण चौकसी करूंन कार्यवाही करावी आणि त्या दोन Ph.D. विद्यार्थी यांना लवकरात लवकर न्याय द्यावा.तसेच विद्यापीठात वस्तिगृहात मूलभूत सुविधाचा अभावा आहे.विद्यार्थीना तत्काळ सुविधा प्रदान कराव्या, विद्यार्थीना त्रास होवु नए ,तसेच बदल्यांमध्ये विशिष्ट माणसाला तोड़ पाहुन  बदली देतात त्या मुळे काही कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यान्ना नाहक त्रास होवू नये. यानंतर असे झाल्यास  बहुजन समाज पार्टी, गडचिरोली आंदोलनात्मक भूमिका स्विकारेल याची विद्यापीठने दक्षता घ्यावी ,अशी तंबी दिली. यावेली विधानसभा अध्यक्ष श्री. मंदीप एम गोरडवार, बहुजन समाज पार्टी विधानसभा गडचिरोली, मा.रमेश मडावी माजी प्रदेश सचिव बनें, मायाताई मोहुर्ले, जिला अध्यक्ष महिला बनें गडचिरोली, कांता कंबळे, सुधीर वालदे प्रभारी विधानसभा गडचिरोली, नरेश महाडोळे सामाजिक कार्यकर्ता, सूरज खोबरागड़े गडचिरोली, जॉनी सोमणकर, विलास मशाखेत्री , महाशय चामोर्शी, दामाजी सातपुते चामोर्शी, तसेच इतर कार्यकरते उपस्थित होते।

                          मंदीप एम गोरडवार मुख्य संपादक (EDITOR IN CHIEF)


PostImage

Gadchiroli Varta News

July 6, 2024   

PostImage

अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु काँग्रेस नेत्या …


अखेर शहराच्या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु

 

काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

 

देसाईगंज-

    अतिदुर्गम,आदिवासीबहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ व व्यापार नगरी म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गावर मोठ मोठे खड्डे पडल्याने पावसाच्या दिवसात वाहनांना अपघात होऊन गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही गंभीर बाब लक्षात घेता शहराच्या मुख्य मार्गावर पडलेले खड्डे यथाशिघ्र बुजविण्यात यावेत,अन्यथा बेशरमाची झाडे लावुन तीव्र निषेध करण्याचा इशारा काँग्रेस नेत्या डाॅ.शिलु चिमुरकर यांनी मुख्याधिकारी डाॅ.कुलभुषण रामटेके यांना दिला असता अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

     देसाईगंज शहर हे लगतच्या चारही जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. देसाईगंज वरून अलिकडे सुरजागड लोह खनिजाची वाहतुक वाढल्याने तसेच व्यापार नगरी असल्याने खरेदीसाठी लगतच्या जिल्ह्यातुन येणारांचा मोठा ओघ आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस असुन पडलेल्या खड्ड्यात पाणी साचुन राहात असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही.यामुळे वाहनांना अपघात घडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता बळावली होती.

     जड वाहनांची वर्दळ त्यातच बारमाही जड वाहतुक होत असल्याने एकदा डांबरीकरण करणाऱ्या कंत्राटदाराला सदर मार्गाची देखभाल दुरस्ती करणे आवश्यक आहे.मात्र डांबरीकरण करतांना आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून निकृष्ठ दर्जाचे डांबरीकरण करण्यात आल्याने डांबरीकरण उखडून मुख्य मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत.यात नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रमुख मार्गासह राष्ट्रीय महामार्गाचाही समावेश असल्याने व सदर बाब नगर प्रशासनाच्या अंतर्गत येत असल्याने मुख्याधिकारी तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन यथाशिघ्र खड्डे बुजविण्याचे काम मार्गी लावावेत,अन्यथा विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतिने पडलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी बेशरमाची झाडे लावून तीव्र निषेध करण्याचा इशारा डाॅ.चिमुरकर यांनी संबंधितांना दिला होता.याची दखल घेत मुख्य मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला युद्धस्तरावर सुरुवात करण्यात आल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन डाॅ.शिलु चिमुरकर यांचे आभार मानले आहे.