अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत
विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा
गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. श्री. धर्मपाल मेश्राम यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.
दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी ११.०० वाजता गडचिरोली येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० पर्यंत अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांबाबत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेसोबत आढावा व चर्चा. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या योजनांचा आढावा. दुपारी १.०० ते २.०० गोंडवाणा विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिव व प्रबंधकांसोबत शैक्षणिक विषयांवरील चर्चा. दुपारी २.०० ते ३.०० राखीव. दुपारी ३.०० ते ४.३० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत विविध योजनांबाबत चर्चा. दुपारी ४.३० ते ५.०० अनुसूचित जाती-जमातीच्या संघटनांसोबत चर्चा व निवेदने स्वीकारणे. रात्री गडचिरोली येथे मुक्काम.
१७ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता गोंदियाकडे प्रयाण.
000
नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय तरुणाचा गळा कापला
भंडारा:-नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली असली तरी देखील अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. मात्र, हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. लाखनी येथील उड्डाणपुलावर भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा कापला. ही धक्कादायक घटना १३ जानेवारीरोजी सायंकाळच्या सुमारास घडली. शुभम जियालाल चौधरी रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे जखमी तरुणाचे नाव आहे.
शुभम हा मकरसंक्राती निमित्ताने दुचाकीने भंडाराकडून गोंदियाच्या दिशेने जात होता. दरम्यान, लाखनी शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापला गेला. यात शुभम गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याला भंडाराच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरवर्षी मकरसंक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात पतंग उत्सवाचे आयोजन केले जाते. यात नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. बंदी असतानाही मांजाची विक्री होत आहे. यात पशुपक्षी तर जखमी होत आहेत. मात्र, आता याचा सर्वाधिक दुष्परिणाम मानवावरही दिसून येत आहे. याच नायलॉन मांजामुळे २४ वर्षीय शुभमचा गळा कापला गेला. सुदैवाने तो बचावला.
नायलॉन मांजा बंदीबाबत प्रशासनाने गंभीर पावले उचलावीत, त्याचबरोबर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली.
फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
अहेरी:-
'फ्री फायर' या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून झालेल्या मैत्रीवरून नाशिकच्या तरुणाने अहेरीत येऊन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना १२ जानेवारीला उघडकीस आली. नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहम्मद सौद राजू शमसुद्दीन अन्सारी वय २२ रा. मालेगाव जि. नाशिक असे आरोपीचे नाव आहे. अहेरीच्या एका १४ वर्षीय मुलीची त्याच्याशी फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळताना ओळख झाली होती. यातून दोघांत रोज चॅटींग व्हायची. त्यानंतर फोनवरुन बोलणे सुरु झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत आरोपी तरुणाने ११ जानेवारीला नाशिकहून अहेरी गाठले. मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. यावेळी त्याने मुलीच्या घरी मुक्काम करुन अत्याचार केला.
दरम्यान, सकाळी काही लोकांना पीडित मुलीच्या घरी अनोळखी तरुण असल्याची कुणकुण लागताच नागरिकांनी मुलीच्या घरातून त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुलीचा जबाब नोंदवून कलम ६४० (१),६५ (१) भारतीय न्याय संहिता, सह कलम ४,६ लैंगिक अपराधा पासून बालसंरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. या घटनेमुळे अहेरीतील पालकांना धक्का बसला आहे. आरोपी मोहम्मद सौद अन्सारीला १३ जानेवारी रोजी अहेरी सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातही 'ऑनलाईन'चा विळखा
एरवी समाज माध्यमावर झालेल्या ओळखीतून अत्याचार झाल्याचा घटना शहरी भागात दिसून येतात. मात्र, याचे लोन गडचिरोलीतील ग्रामीण भागातही पसरल्याचे चित्र आहे. अहेरीतील घटनेने पालकांना धक्का बसला आहे. यापूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहे. मधल्या काळात वृद्धांचीही अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले होते. परंतु आता यामाध्यमातून अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात येत आहेत
यातील केवळ काहीच प्रकरणाचा उलगडा होतो तर अनेक प्रकरणात सामाजिक प्रतिष्ठेमुळे पालक तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन पाल्यांना मोबाईल देत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून केल्या गेले आहे.
दुचाकीची कट मारुन, दोन तरुणांवर धारदार शस्त्राने केला हल्ला, दोन्ही तरुण गंभीर
चंद्रपूर :
दुचाकीची कट लागल्याच्या वादातून ३ जानेवारी रोजी तन्मय जावेद शेख याची दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याची शाई वाळत नाही तेच काल १२ जानेवारी ला कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दोन जण जखमी झाल्याची घटना चंद्रपुरात घडली.
जटपुरा गेटकडून गांधी चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकी चालकाने कट मारले. यावरून वाद झाल्यानंतर कट मारणाऱ्यानी दोन जणांवर धारदार शस्त्राने वार करून दोघांना जखमी केले. ही घटना गिरनार चौकात १२ जानेवारी ला रात्री १०.३० वाजता घडली. शहर पोलिसांनी हल्लेखोर आकाश येलेवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिम ट्रेनर साहिल चंद शेख (३३) रा. इंदिरा नगर पंचशील चौक चंद्रपूर हा त्याचा मित्र राहुल गजानन वानखेडे (३०) रा. बालाजी वॉर्ड याच्यासोबत त्यांच्या दुचाकीने गांधी चौकाकडे जात असताना आकाश सुधाकर येलेवार, रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर हे गांधी चौकाकडे जात असताना त्यांच्या दुचाकीने कट मारले. साहिलने त्याला अडवल्यावर त्याने शिवीगाळ केली. यावरून त्यांच्यात वाद झाला असता आकाशने साहिलच्या पोटावर व डाव्या खांद्यावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने वार केले. राहुल त्याला वाचवण्यासाठी पुढे आला असता त्याच्या पोटावरही वार करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले. तेथे जमलेल्या जमावाने हल्लेखोराला ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात नेले. जखमीचा तक्रारी वरून व वैद्यकीय अहवालाच्या आधारे शहर पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध कलम ११८ (१), २९६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांचा मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक गुरनुले तपास करत आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात ग्रंथप्रदर्शनी
आष्टी (अशोक खंडारे):-
वाचन संकल्प महाराष्ट्र या संकल्प ने वर आधारित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आष्टी येते, वाचन संस्कृती पंधरवडा महाविद्यालयातील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाच्या वतीने “ग्रंथप्रदर्शनी “आयोजित करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रंथालयात उपलब्ध संदर्भ ग्रंथ,चरित्र,स्पर्धापरीक्षा,विश्वकोष, मासिके इत्यादी वाचन साहित्याचे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. आणि त्यातून विविध विषयांवरील ग्रंथा विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. संजय फुलझेले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्याच्या मनात वाचनाविषयी उत्सुकता ,वाचन संस्कृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाला उपस्थिती डॉ. राज मूसने,डॉ. रवि शास्त्रकार ,प्रा.नाशिका गभने .कार्यक्रमाचे संचालन प्रा.ज्योती बोबाटे तर आभार प्रदर्शन प्रा.रवि गजभिये यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.राजकुमार लखमापुरे,श्री. निलेश नाकाडे,श्री. आय.आर.शेख, श्री.एम.डी. मुश्ताक, संजित बच्चाड,श्री.प्रभाकर भोयर, दिपक खोब्रागडे,संतोष बारापात्रे, महा.विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
जयपुर येथील सहाव्या पॅरा राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत आष्टीच्या दिव्यांग श्वेताला रौप्य पदक
नागपूर विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शाहीन ताई हकीम यांनी केले अभिनंदन
आष्टी:-(अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९)
दिनांक 11/01/2025 ते 13/01/ 2025 दरम्यान पौर्णिमा विद्यापीठ जयपूर या ठिकाणी सहावी राष्ट्रीय पॅरा धनुर्विद्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये खेलो इंडिया सेंटर आष्टी तथा महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी श्वेता भास्कर कोवे हिने संघिक रौप्य पदकाची कमाई केली.व गडचिरोली जिल्ह्याचे तथा वन वैभव शिक्षण संस्थेचे नाव रोशन केले. त्याबद्दल वन वैभव शिक्षण संस्था अहेरीचे उपाध्यक्ष बबलू भैया हकीम तसेच त्यांच्या सहचरणी नागपूर विभागीय राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष शाहीन भाभी हकीम यांनी श्वेताचे मनःपूर्वक अभिनंदन केले व तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य किशोर पाचभाई, महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालय आष्टीचे प्राचार्य संजय फुलझेले,प्रा.सर्फराज आलम, यांनी श्वेताचे अभिनंदन केले.पर्यवेक्षक घाटबांधे तथा सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा श्वेताचे अभिनंदन केले व तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र दिव्यांग खेळाडू श्वेतासाठी झटणाऱ्या डॉ. श्याम कोरडे यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन केले. श्वेताने सुध्दा आपल्या यशाचे श्रेय डॉ. श्याम कोरडे यांना दिले.
दिड महिण्यापुर्वीच्या दुखःतून सावरण्याअगोदरच दुसरा आघात
माजी उपसरपंच पुण्यमुर्तीवार यांचे अपघातात उपचारा दरम्यान मृत्यू
एटापल्ली; (गडचिरोली)
येथील माजी उपसरपंच पापा उर्फ अभय वसंतराव पुण्यमुर्तीवार (वय ४५) यांचे स्वतःच्या दुचाकीवरून कोसळून झालेल्या अपघाताने चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान दुःखद निधन झाले.
पापा उर्फ अभय पुण्यमुर्तीवार हे (ता. १० जानेवारी) शुक्रवारी एटापल्ली वरून तोडसा गावाकडे जातांना दोन किमी अंतरावरील एकरा फाट्याजवळ त्यांचे स्वतःच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात होऊन ते खाली कोसळले होते सदरची माहिती त्यांनी स्वतः नातेवाईकांना फोन करून अपघाताची सांगितली होती. माहितीवरून नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते, अपघातात त्यांच्या छातीच्या खालच्या बरगळीला जबर गुप्त मार लागल्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते, यावेळी त्यांना झालेले दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, गेली तीन दिवसांपासून उपचार सुरू असतानाच (ता. १३) सोमवारी पहाटे तीन वाजताचे दरम्यान पुण्यमूर्तीवार यांची प्राणजोत मालविली, त्यांच्या अकाली व दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून सामाजिक कार्यात अग्रेसर व मनमिळावू स्वभावाचे पापा पुण्यमूर्तीवार यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पापा पुण्यमूर्तीवार यांचे वडील वसंतराव पुण्यमूर्तीवार यांचे दीड महिन्यापूर्वी दीर्घ आजाराने निधन झाले होते, वडिलांच्या निधनाच्या दुःखातून सावरण्यापूर्वीच मुलाचे अपघाती निधना झाल्याने पुण्यमूर्तीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पापा यांच्या मृत्यू पश्चात आई, पत्नी, दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे. अंत्यविधी (ता. १३) सोमवारी सायंकाळी चार वाजता दरम्यान वन विभाग तपासणी नाका जवळील डुम्मे नाला मोक्षधाम घाटावर केल्या गेला घटनेचा पुढील तपास एटापल्ली पोलिसांकडून केला जात आहे.
13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक झाली जवाहर नवोदय विद्यालय शिक्षकाची
• यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है असे म्हणत लाखो रूपाचा गंडा घातला आहे.
गोंदिया, दि. 13 जानेवारी: डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका शिक्षकाची बनावट पोलीस अधिकाऱ्याकडून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे घडला असून या प्रकारामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सविस्तर प्रकरण काय आहे ते समोर पाहूया.
नवेगावबांध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादि भोजलाल रामलाल लिल्हारे वय 51 वर्ष शिक्षक, रा. लवेरी तालुका- किरणापूर जिल्हा- बालाघाट ह. मु. जवाहर नवोदय विद्यालय नवेगावबांध, तालुका अर्जुनी मोर. जिल्हा गोंदिया असे असून यांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे, प्रकाश अग्रवाल असे आरोपीचे नाव असून यांचे मोबाईल क्रमांक - 82578 85667 असे असून त्यांनी दिनांक 26/12/24 रोजी पासून फसवणूक केल्या प्रकरणी नवेगावबांध पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये तक्रार दिनांक 10/1/2025 रोजी दाखल करण्यात आली आहे.
आरोपी प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीचे मोबाईल क्रमांक 8210107669 वर फोन करून व्हाट्सअप कॉल वरून फिर्यादीस मैं पी.ओ. प्रकाश अग्रवाल बॅच नंबर- 3378 क्राईम ब्रांच मुंबई से बात कर रहा हूं। आपके नाम पर मुंबई ठाणे मे ईलिगल एडोटाइजमेंट अँड हरासमेंट का केस दर्ज है! और आपके नाम से कॅनरा बँक मे खाता खोला गया है.
और नरेश गोयल ने 2 करोड रुपये अकाउंट से फ्रॉड किया है! जिसके आप 148 वे सस्पेक्ट हो. जिसका 20% कमिशन आपको दिया है. इसलिये आप अपने सभी खातो की जानकारी दो उनकी जाच होगी, और ये पैसा आपका सायबर सेफ कस्टडी खाता मे ट्रान्सफर करना होगा! ट्रान्सफर नही किये, तो आपको मुंबई क्राईम ब्रांच मे आना होगा. या तो फिर आपको अरेस्ट करके लायेंगे, तो आपकी क्या इज्जत रह जायेगी, सही पाया गया तो आपके पैसे वापस हो जायेंगे. यह बात किसी को बताना नही अगर बताये तो आपको और आपके परिवार की जान को खतरा है. यह नॅशनल सिक्रेट है.
तुम अभी के अभी एन. आय. खाते मे पाच लाख रुपये ट्रान्सफर करो असे आरोपीने मी लोकसेवक आहे असे बतावणी करून बनावट अरेस्ट वॉरंट मोबाईल व्हाट्सअप वर दाखवून बोलल्याने फिर्यादीने दिनांक : 28/12/2024 ला 5 लाख रुपये दिनांक : 27/12/24 ला 4 लाख 68 हजार रुपये व 99 हजार रुपये दिनांक 28/12/24 ला तसेच 2 लाख 77 हजार रुपये असे एकूण 13 लाख 44 हजार रुपये आरोपीने सांगितलेल्या बँक खाते क्रमांक वर पाठविले असल्याची माहिती दिली आहे.
तर मोबाईल क्रमांक 8257885567 चा धारक इसम नामे प्रकाश अग्रवाल यांनी फिर्यादीस अरेस्ट करण्याची धमकी देऊन फिर्यादीची एकूण 13 लाख 44 हजार रुपये ची ऑनलाईन फसवणूक केली आहे, असा फिर्यादीच्या तोंडी तक्रार वरून आरोपीचे कृत्य वरील कलमान्वये होत असल्याने आरोपी विरुद्ध अप क्रमांक : 03/2025 कलम 336 (2), 319 (2), 318 (4), 340 (1), 340 (2), 204, 351 (2) भा. न्या. स. 2023 सह कलम-66 (D) माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून नवेगावबांध पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.
त्रिवेणी कंपनीचे एमडी .बी. प्रभाकरण यांनी दिले मोफत हेल्मेट व जनजागृतीचा संदेश
आष्टी:- (अशोक वासुदेव खंडारे)
त्रिवेणी कंपनीने गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडच्या टेकड्यांवर तिन वर्षांपूर्वी लोहखनिज उत्खननाचे काम सुरू केले असून ते काम अजूनही सुरू आहे.
कंपनी जिल्ह्याच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत असून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि स्वच्छता सेवा पुरवत आहे. यासोबतच वाहतूक व्यवस्थित आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी वाहतूक मार्गावर विनोद कुमार यांच्या देखरेखीखाली बचाव प्रतिसाद दल तैनात करण्यात आले आहे. रेस्क्यू रिस्पॉन्स टिम रस्ते अपघातांचा तपास करणे, जखमींना हॉस्पिटलमध्ये नेणे आणि वाहतूक व्यवस्थापनाचे कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील वर्षांत झालेल्या अपघातांचे विश्लेषण केल्यास असे दिसून आले की, बहुतांश अपघात हे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे आणि रस्त्याच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाले आहेत. या सर्व चुका लक्षात घेऊन त्रिवेणी कंपनीचे एमडी श्री.बी. प्रभाकरन यांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात चार एलईडी व्हॅनच्या माध्यमातून लोकांना जनजागृतीचा संदेश दिला आणि मोटारसायकल स्वारांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करून आनंदी जीवन जगण्याचा सल्ला दिला.दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालूनच वाहण चालवावे जेणेकरुन आपल्या जीवनात आनंदी आनंद राहील असा संदेश दिला आहे.
राज्यात मदिरा महागणार , मदिरा प्रेमींसाठी वाइट बातमी
मुंबई:-
मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी समोर येत आहे. आता राज्य सरकार दारूच्या किमतीत वाढ करणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार दारूच्या किमती वाढवण्याचा विचार करत आहे. दारूपासून उत्पन्न कसे वाढवता येईल याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जनतेला अनेक लोकप्रिय आश्वासने दिली आहेत, ज्यांची अंमलबजावणी जमिनीवर करण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. हे लागू केल्याने सरकारी तिजोरीवर मोठा भार पडेल. हा भार कमी करण्यासाठी सरकार दारूवरील कर वाढवण्याची तयारी करत आहे.
५ सदस्यीय समितीची स्थापना
महाराष्ट्र सरकारने दारूपासून उत्पन्न कसे वाढवायचे हे शोधण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती दारूचे उत्पादन आणि विक्रीच्या शक्यतेचा अभ्यास करेल. गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे, ज्यामध्ये वित्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्य जीएसटी आयुक्त आणि उत्पादन शुल्क आयुक्त हे समितीचे सदस्य आहेत. या समितीला दारूचे उत्पादन वाढवण्याचे, नवीन दारू परवाने देण्याचे आणि महसूल वाढवण्याच्या इतर मार्गांचा अभ्यास करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्याची शिफारस समिती करू शकते अशी अपेक्षा आहे.
सरकारला पैशांची गरज
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी, राजकीय पक्षांनी लाडकी बहिण योजनेची मदत रक्कम वाढवणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे, मोफत वीज देणे इत्यादी अनेक लोकप्रिय आश्वासने दिली होती. आता हे करण्यासाठी सरकारला पैशांची गरज आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये म्हणून, सरकार येत्या काळात दारूच्या किमती वाढवून आपले उत्पन्न वाढवेल.
आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच कर्जमाफी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिक राव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली किंवा वाईट नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय सहकार विभागाच्या अखत्यारीत येतो. ही यादी फक्त सहकार विभागामार्फत मागवली जाते. आमच्या कृषी विभागाकडे ते काम नाही, पण तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतील. सध्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ४ ते ६ महिन्यांत निर्णय घेतला जाईल.
शेतकरी कर्जमाफी रखडली आहे का?
लाडकी बहिण योजनेमुळे आर्थिक भार वाढला आहे, असेही कृषीमंत्री कोकाटे म्हणाले. म्हणूनच शेतकऱ्यांसाठी थोडेसे अधिशेष निर्माण करणे शक्य नाही. यासाठी आपण थोडे पुढे-मागे करत आहोत. आम्ही एक दिवस शेतकऱ्यांबाबत निर्णय घेऊ.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा
गडचिरोली- अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक चांदेकर भवन येथे नुकतीच पार पडली.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सुरेखाताई बारसागडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधान सभा अध्यक्ष प्रदीप भैसारे , महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे , जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे हे प्रामुख्याने हजर होते.
या बैठकीत पक्ष संघटना व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या समस्यांवर सुद्धा चर्चा करण्यात आली व संगठन बांधणीचा कार्यक्रम ठरविण्यात आला. आगामी निवडणुका पक्षातर्फे लढविण्यासाठी बरेच उमेदवार इच्छुक असल्याने संबंधीत क्षेत्रात जनसंपर्क वाढवून संगठन अधिक मजबूत करण्यावर बैठकीत भर देण्यात आला व कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
लवकरच जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा सुद्धा घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. रिपब्लिकन पक्ष हा दलित आदिवासी व गोरगरीब लोकांसाठी लढणारा पक्ष असल्याने जास्तीती जास्त लोकांना पक्षात सहभागी करून त्यांच्या हक्क व अधिकारांसाठी संघर्ष सुरु ठेवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रिपब्लिकन पक्ष आज गटातटात विखुरलेला असला तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय आंदोलनाची व विचारधारेची खरी ओळख हाच पक्ष आहे आणि म्हणून तीच आंबेडकरी लोकांची पहिली पसंती असल्याचे प्रतिपादन रोहिदास राऊत यांनी यावेळी बोलताना केले व हा पक्ष अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
बैठकीला कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, तालुका अध्यक्ष पुंजाराम जांभूळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते पुण्यवान सोरते, सिद्धार्थ खोब्रागडे, विजय देवतळे महिला आघाडी शहर अध्यक्ष वनमाला झाडे, चंद्रभान राऊत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महागाव येथे क्षयरोग उच्चाटनसाठी जन जागृती रॅली
अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
अहेरी:-
टी बी म्हणजेच क्षय रोगाच्या उच्चाटनासाठी १०० दिवस टी बी कार्यक्रम अंतर्गत महागाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे क्षयरोगाबाबत जनजागृती साठी भव्य रॅली काढण्यात आली.
टी बी प्रतिबंध,लवकर तपासणी,उपचार, समुपदेशन करून नागरिकांना या रोगाबद्दल माहिती देण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ लुबना हकीम, प्राथमिक आरोग्य केंद्र च्या एएनएम गोगे,आरोग्य उपकेंद्राच्या ए एन एम सिंग,आशा वर्कर जिजा सडमेक,चालक दिनेश अलोणे तथा जिल्हा परिषद शाळा महागाव चे मुख्याध्यापक आत्राम तथा शिक्षक उपस्थित झाले होते.
रॅली ही संपूर्ण गावात काढण्यात आली आणि रस्त्यावरील घरोघरी माहिती देण्यात आली.
टी बी विषयी भीती न बाळगता त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे कारण योग्य औषध उपचार आणि चांगला आहार,योग्य काळजी याने टी बी आजार बरा होऊ शकतो.आणि रोग्याने कोणती खबरदारी घेतली तर तो इतरांना होणार नाही याबाबत डॉ लूबना हकीम यांनी विद्यार्थी तथा इतरांना मार्गदर्शन केले.
कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी घातली कांस्य पदकास गवसणी
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
कराटे स्पर्धेत महेश शेंडे यांनी कांस्य पदकास गवसणी घातली आहे
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हा हा जल, जंगल ,खणीज संपत्ती आणि जमीन यांनी समृद्ध आहे.
अत्यंत दुर्गम भागात क्रीडा सुविधांची वानवा असतानाही त्यांनी आपल्या मेहनतीने गाव व जिल्ह्याला नाव लौकिक मिळवून दिले आहे सामान्य कुटुंबातून जन्माला आलेला 22 व्या अखिल महाराष्ट्र वू-शू असोसिएशनच्या मान्यतेने खेळाची आवड असलेल्या 3 दिवसीय राज्यस्तरीय वू-शू कराटे स्पर्धेत यशवंत महाविद्यालय क्रीडा संकुल नांदेड जिल्ह्यामध्ये गडचिरोली वू-शू झिग-झॅग अकॅडमीचे प्रतिनिधित्व करीत
महेश पांडुरंग शेंडे याने आपल्या अथक परिश्रमाने आणि आपल्या असामान्य खेळाचे चमकदार प्रदर्शन करून कांस्य पदक जिंकून गावासह जिल्ह्याचे नाव उंचावले. त्याच्या यशाचे श्रेय त्याचे आई-वडील, क्रीडा प्रशिक्षक मिलिंद साळवे, वु-शू मास्टर गुलाब मेश्राम, कराटे मास्टर कपिल मसराम, मार्गदर्शक विनय बोडखे, आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे , यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पवार, पीएसआय वनवे, पोलीस उपनिरीक्षक जगताप आदिंनी सकाळच्या कडाक्याच्या थंडीत शारीरिक तंदुरुस्ती सोबतच या ठिकाणी पोहोचण्यात मोलाचा वाटा उचलला. आगामी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा.
पाणिपुरीच्या हातठेल्याला अर्टीकाची जब्बर धडक एक ठार तर ६ जन गंभीर जखमी
यवतमाळ :- पांढरकवड्या वरुन शिबला रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या अर्टिका गाडीने समोरुन येणाऱ्या पाणीपुरी च्या हातठेल्या ला जोरदार धडक दिल्याने हातठेला चालक जागेवरच ठार झाला. हि भंयकर घटना चालबर्डी गावाजवळील लहान पुलाजवळ दिनांक ०८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता च्या दरम्यान घडली आहे. मृतक रामजनक बाबूराम बघेल वय ४१ रा. रामनगर पांढरकवडा असे अपघातात ठार झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे. रामजनक बघेल हा हात ठेल्यावर गावोगावी जावून पाणीपुरी विक्री चा व्यवसाय करीत होता व आपल्या कुटूबांचा उदरनिर्वाह चालवित होता. अपघाताच्या दिवशी रामजनक हा चालबर्डी या गावी दुपारी ०२ वाजता पाणीपुरी विकण्याकरीता गेला होता.
पाणीपुरीचा व्यवसाय करुन रात्री ८.४५ वाजता दरम्यान चालबर्डी येथून आपल्या घराकडे परत येत असताना चालबर्डी जवळील लहान पुलाजवळ समोरून येणाऱ्या अर्टीका वाहन क्रं. एम एच ३४ बीबी ०९९८ च्या चालकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजी पणाने चालवून समोरुन येणाऱ्या हातठेल्याला जोरदार धडक दिली या मध्ये हात ठेला चालक रामजनक याच्या जागेवरच मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या डोक्यातून खुप रक्त वाहले त्याचा डावा पाय शरीरापासून वेगळा झाला होता.
त्यामुळे रामजनकचा जागेवरच मृत्यू झाला. तर अर्टिका मधील सहा जण जखमी झाले व अर्टीका गाडी दुरपर्यंत घासत जावून रोडच्या बाजूला असलेल्या शेतात जावून पडली. गाडीतील जखमी रघुनाथ कोवे वय ५३ वर्ष, सुरेंद्र नैताम वय ३९ वर्ष, युवराज पेंदोर वय ३० वर्ष, अंकूश कोवे वय ४ वर्ष जयप्रकाश पेंदोर वय ९ वर्ष सर्व रा. महाडोंळी व अर्टिका वाहन चालक नागेश्वर वसंता कोवे २७ रा.साखरा ता. घांटजी आहे. पांढरकवडा येथील पोलीस स्टेशनला माहिती मिळताच घटना स्थळी पोलीस निरीक्षक दिनेश झाबरे , पोलीस आशिष गजभिये, लक्ष्मी मलकुलवार , सचिन काकडे, सुनिल कुंटावार, जुनुनकर साहेब, राजु बेलयवार, यांनी पंचनामा करून जखमीना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु गंभीर जखमी असलेल्या ६ पेशंटला वसंतराव नाईक रुग्णालय यवतमाळ ला लगेच रेफर करण्यात आले या अपघाताची तक्रार विवेक माधवसिंग बघेल ३६ रा. रामनगर यांनी पोलीस स्टेशन ला दिली असून पोलीसांनी अर्टिका चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लक्ष्मी मलकुलवार करीत आहेत.
तळिरामाने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून केले गंभीर जखमी
कोरची :
एका तळिरामाने शुल्लकच्या वादातून आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे
कोरची तालुका मुख्यालयापासून ५ किलोमीटर अंतरावरील दोडके येथे पतीने घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ६ जानेवारी रोजी सायंकाळी घडली.
संतारोबाई कोरेटी (४५) असे जखमी महिलेचे नाव आहे. आशू कोरेटी (५०, रा. दोडके) हा दि ६ रोजी सायंकाळी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी घरगुती कारणावरून दोघांत शाब्दिक चकमक उडाली. यानंतर आशू
कोरेटी याने रागाच्या भरात कुन्हाडीने पत्नीवर हल्ला चढविला. यात तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली. जखमी संतारोबाई यांना त्यांच्या भावाने कोरची ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलीसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे
अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेठबिगारी थांबवावी,स्वतंत्र मजूर युनियनची मागणी
प्रविण तिवाडे कार्यकारी संपादक/ वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली- डॉ.ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजने अंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांना फक्त १,००० रुपये दरमहा मानधन देऊन शासन या महिलां कडून एक प्रकारे वेठबिगारी करवून घेत आहे. ही वेठबिगारी त्वरित थांबविण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियन चे जिल्हा सरचिटणीस गौतम मेश्राम यांनी केली आहे.
उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजिण्यात आला होता त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार रोहिदास राऊत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर सामाजिक कार्यकर्ते तुलाराम राऊत, स्वयंपाकीन महिला संगठनेचे नेते कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजार होते.
सदर स्वयंपाकीन महिला मागील नऊ वर्षांपासून १,००० रुपये एवढ्या अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करीत आहेत. ऊन, वारा, पाऊस या सर्व दिवसात त्या आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढविण्यात आलेले नाही, हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे.
तेंव्हा शासनाने त्याचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणीही मेश्राम यांनी यावेळी केली. स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्ये बद्दल आवाज उचलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले.
रोहिदास राऊत यांनीही यावेळी मार्गदर्शन करून स्वयंपाकीन महिलांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. शासन स्वतःच आपल्या किमान वेतन कायद्याला हरताळ फासत असून ग्रामीण व गरीब महिलांसोबत क्रूर थट्टा करीत असल्याचे ते म्हणाले. शासनाने हि थट्टा त्वरित थांबवावी आणि महिलांना न्याय द्यवा अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
तुकाराम राऊत यांनी महिलांचे संघटन पुन्हा मजबूत करण्याचे व या अन्याया विरुद्ध आवाज उचलण्याचे आवाहन केले. महिला संघटनेचे कृष्ण चौधरी यांनी प्रास्ताविकातून अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांच्या समस्या मांडल्या आणि या मागण्या पुढे रेटण्यासाठी हा संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला.
अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान २०,००० रुपये एवढे वाढविण्यात यावे, त्यांचे मानधन नियमितपणे दरमहा देण्यात यावे, या महिलांचे स्वतंत्र मस्टर बुक ठेवण्यात यावे, साप्ताहिक सुटी देण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, पेन्शन लागू करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे ठराव मेळाव्यात पारित करण्यात आले.
या मेळाव्याला आरमोरी, वडसा कुरखेडा कोरची व धानोरा या पाच तालुक्यांतून दोनशेहून अधिक महिला कामगार उपस्थित होत्या.
दिपालीबावनथडे, संध्या लोंबले, वैशाली नरोटे, वैशाली मडावी, ममता नाकाडे, गायत्री सयाम सीमा गोटा, शकुंतलागावडे, अश्विन गुरनुले, रीमा नैताम, शारदा बर्डे, अंजु गेडाम व अन्य महिलांनी या मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा
पत्रकारांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे मागणी
गडचिरोली:-
छत्तीसगड मधील एनडीटीव्ही चे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची नुकतीच खाण माफियांनी निघृण हत्या केली. महाराष्ट्रातही असे अवैध धंदे करणाऱ्या माफियांची पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे, त्यांची हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांच्या पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की पत्रकार चंद्राकर यांची खाण माफियांनी निघृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करण्यात आले. ही गंभीर बाब आहे. गडचिरोली जिल्हा सुद्धा छत्तीसगडच्या सीमेवर असून जिल्ह्यात सुध्दा अनेक खाण माफिया असून ते मुरुम, रेती माती, गिट्टी या सह गौनखनिज आणि गौन वनोपजांची अवैध वाहतूक करीत असतात. त्यांची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी जाणाऱ्या पत्रकारांना त्यांच्या अशा कुकृत्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकार हे निर्भिडपणे आपले काम चोख बजावू शकत नाहीत.
सरकारने पत्रकार संरक्षण कायदा बनविला आहे. मात्र या कायद्याची प्रशासनाकडून प्रभावी पणे अंमलबजावणी करण्यासाठी उचित पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे पत्रकार चंद्राकर यांच्या हत्येनंतर सरकार आणि प्रशासनाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. यासोबतच निवेदनाची प्रत केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली असून चंद्राकर यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि देशभरातील पत्रकारांना उचित संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली आहे.दुपारी एक वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील पत्रकारांनी गांधी चौकातून बाईक रॅली च्या माध्यमातून मुक मोर्चा काढला. यात जिल्ह्यातील १२ ही तालुक्यातील पत्रकार एकवटले होते. पत्रकारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर हा मुक मोर्चा पोहोचला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या बैठक कक्षात सर्वांना पाचारण करून त्यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदिंसाठी तयार केलेल्या मागण्याचे निवेदन स्वीकारले व ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर यांचे कडून नेमका विषय समजून घेतला व सदर विषयावर गडचिरोली जिल्हा प्रशासन सकारात्मक भूमिका घेतानाच पत्रकारांच्या तीव्र भावना राज्य सरकार पर्यंत पोहोचविल असे आश्वासन दिले. यानंतर पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सुध्दा निवेदन देऊन आपल्या मागण्या पोलीस प्रशासनापुढे ठेवल्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांचे वतीने अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी निवेदन स्वीकारले.मोर्चाचे संयोजक पत्रकार मुनीश्वर बोरकर, गडचिरोली प्रेस क्लबचे सुरेश पद्मशाली, ज्येष्ठ पत्रकार हेमंत डोर्लीकर, गामाचे संयोजक उदय धाकाते, व्हाइस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार, लोकमत पत्रकार संजय तिपाले, जयंत निमगडे, मुकुंद जोशी, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे जगदिश कन्नाके, मारोती भैसारे विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कहूरके, कालीदास बुरांडे, नासिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, रेखाताई वंजारी, विजयाताई इंगळे, तिलोतमा हाजरा, मंगेश भांडेकर, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतिश ढेंभुर्णे गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे या सह जिल्हयातील शंभराहून अधिक पत्रकार उपस्थित होते.
जंगलात केली चितळाची शिकार, सरपंच फरार तर तिन इसम जेरबंद
प्रमोद झरकर वैनगंगा वार्ता 19 गडचिरोली
सिरोंचा:-
जंगलात रात्री चितळाची शिकार करुन विल्हेवाट लावण्यासाठी लगबग सुरू असताना अचानक वनविभागाने पथकाने धाड घातली असता सरपंच फरार झाला तर मोठ्या शिताफीने तिन इसमास अटक करण्यात आली आहे
सिरोंचा तालुक्यातील वडधम गावाच्या जंगलात जिवंत विद्युत तार सोडून चितळाची शिकार केल्याची घटना ८ जानेवारी रात्रीच्या सुमारास घडली. वनविभागाने यातील आरोपींचा शोध घेतला असता या घटनेत वडधमच्या सरपंच व अन्य दोघांचा समावेश आहे. तिघांच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, सरपंच फरार आहे.समय्या किष्टय्या सिंगनेनी (सरपंच पोचमपल्ली), सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी, राजेश्वर सवेश्वर आकुला (सर्व रा. वडधम) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश्वर, सवेश्वर व राकेश यांना अटक करण्यात आली आहे. तर सरपंच समय्या हा फरार आहे. ८ जानेवारी रोजी
वनविभागाचे पथक गस्तीवर असताना वडधम गावात विद्युत लाइन ट्रीप झाल्याचे लक्षात आले तेव्हा अनुचित घटनेचा संशय आला. वर्धम गावात चौकशी केली असता जंगलात वन्यप्राण्यांची विद्युत तारेचा स्पर्श लावून शिकार केल्याची माहिती मिळाली. वनकर्मचारी शिकार झालेल्या ठिकाणाचा शोध घेत
असताना राजेश्वर सवेश्वर आकुला हा दिसून आला. त्याचवेळी राजेश्वरच्या भ्रमणध्वणीवर शिकारसंदर्भात फोन आला. तेव्हा त्याला अधिक विचारणा केली असता त्याने सांगितले की गोदावरी नदीपात्रापासून अंदाजे ३०० मीटर अंतरावरील जंगलात शिकार झाली. त्याला सोबत घेऊन शिकारीचा शोध घेत असताना वाटेत चितळाचे शिर मिळून आले. समोर काही इसम दिसून आले. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली. प्रकरणाची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. सुरपाम करीत आहेत. ही कारवाई वनपाल डी. बी. आत्राम, वनरक्षक आर. वाय. तलांडी, डी. यु. गिते, एस.एस. चौधरी, व्ही. ए. काटींगल, आर. के. आत्राम यांनी केली.नदीपात्र ओलांडून आरोपींना केली अटक
वनकर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करीत गोदावरी नदीपात्र ओलांडून सवेश्वर समय्या आकुला, राकेश मलय्या जेट्टी यांना ताब्यात घेतले. समय्या किष्टय्या सिंगनेनी फरार होण्यात यशस्वी झाला. त्याचा इतरत्र शोध घेतला असता मिळून आला नाही.
ग्रामस्थांनी उधळला अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव
पांढरकवडा (यवतमाळ): एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा डाव असफल केला याबाबत पोलिसांनी तीनः जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.आरोपींमध्ये एका मुलीसह एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. आदिलाबाद येथील रणदिवसनगर मधील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, अजय गंगाधर आडे (३०), वीणा मारोती किनाके (२३, रा. पाटणबोरी) अशी आरोपींची नावे आहेत. ७ डिसेंबरला सायंकाळच्या दरम्यान पाटणबोरी येथील एका शाळेतील दहाव्या वर्गातील १६ वर्षीय मुलीस तिच्या ओळखीच्या गावातीलच वीणा मारोती किनाके (२३) हिने शाळेतून घरी नेले व त्यानंतर ती तिला इतर दोन आरोपीसोबत अदिलाबाद येथे घेऊन जात होती. यावेळी त्या अल्पवयीन मुलीच्या मामाच्या मित्रास ती मुलगी दिसून आल्याने त्याने मुलीच्या मामाला याची माहिती दिली. तेव्हा त्या अल्पवयीन मुलीच्या मामासह गावातील इतर नागरिक पाटणबोरी येथील अदिलाबाद मार्गावर आले. त्यांनी तिनही आरोपींना मुलीस कुठे नेत आहे याची विचारणा केली असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. नागरिकांनी त्या सर्वांना पाटणबोरी आऊटपोस्टमध्ये नेले. पोलिसांनी विचारपूस केली असता, या मुलीस फूस लावून अदिलाबाद येथे नेत असल्याचे स्पष्ट झाले.
भीमशक्ती महिला आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी : पद्मिनी शेवडे
सोलापूर :-काँग्रेस (i)पक्षाचे राष्ट्रीय नेते व राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी भीम सैनिकांच्या डॅशिंग नेत्या पद्मिनी वरिष्ठराव शेवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परवा सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष नागनाथ बंगाळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांची निवड घोषित करण्यात आली.
शेवडे ह्या आंबेडकरी चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्यां असून विविध आंदोलनात सहभाग नोंदवून एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद (नाना )प्रेक्षाळे, समता सैनिक दलाच्या वैशाली उबाळे,नंदा चव्हाण सामाजिक कार्यकर्ते विलास सरवदे व लहुजी शक्ती सेनेचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष राहुल मस्के यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना शेवडे म्हणाल्या की माननीय हंडोरे साहेबांच्या नेतृत्वाशिवाय बहुजन समाजाला पर्याय नसून भीम शक्ती च्या माध्यमातून उपेक्षीताना न्याय मिळवून देण्याचे काम करणार असून कामाच्या माध्यमातून आपण संघटना बांधणी करणार आहे.
शेवडे यांची कर्मभूमी जरी मुबई असली तरी त्यांचे जन्म भूमी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा ही आहे. त्यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून स्वागत होत आहे.