PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ


आत्मसमर्पीत नक्षवाद्याची केली नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या, गडचिरोली जिल्ह्यात खळबळ

 

गडचिरोलीःनक्षलविद्यांनी एका आत्मसमर्पीत नक्षलवाद्याची र्गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (26 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जयराम कोमटी गावडे (40) रा. आरेवाडा, तालुका भामरागड असे त्याचे नाव आहे.


प्राप्त माहितीनुसार जयराम कोमटी गावडे आणि त्याची पत्नी नक्षल चळवळीत सामील होते. मागील सात-आठ वर्षापूर्वी दोघांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दोघेही भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथेच आपली शेती, मोलमजुरी करीत उदरनिर्वाह करीत होते 25 जुलै रोजी नक्षलवाद्यांनी आरेवाडा येथे त्याची गोळी झाडून हत्या केली. ही घटना 26 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्यावर एकच खडबड उडाली आहे.

नुकतेच 17 जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने एटापल्ली तालुक्यातील जारावंडी लगत छत्तीसगड सीमेवरील वांडोली जंगल परिसरात 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. यात मोठ्या कॅडरच्या नक्षलवाद्यांचा समावेश होता. या घटनेला 10 दिवस उलटले नाही तोच नक्षलवाद्यांनी भामरागड तालुक्यात आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या केली.

विशेष म्हणजे 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी शहीद सप्ताह पाळतात. यादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान, सुरक्षा दलावर हल्ले, खबरी असल्याच्या संशयावरून हत्या, रस्ते बंद करणे अश्या घटना घडतात मात्र सप्ताहाच्या पूर्वीच भामरागड तालुका मुख्यालया पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे नामक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची हत्या करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday   

PostImage

नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले


नवरगावच्या नाल्याच्या पुरात दुचाकी गेली वाहून मात्र, तिघांना गावकऱ्यांनी वाचविले 


 गडचिरोली - : गडचिरोली जिल्ह्यातील लागुनच असलेल्या नवरगाव येथील नाल्याच्या पुरात वाहून जात असलेल्या तीन इसमास गावकऱ्यांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करीत वाचविल्याची घटना २५ जुलै रोजी घडली 

गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसामुळे चारही बाजुला पुराचा वेढा आहे. त्यामुळे चारही मार्ग बंद आहेत . अश्यातच  चुरचुरा- नवरगांव मार्गावरून नवरगाव च्या पुर्वीच येणारा पुल त्यावर पावसाच्या पाण्यामुळे पुर आलेला होता नवरगाव ला जाण्यासाठी नागपूर वरून येणारे तिन पाहुणे एक महिला, मुलगा व भाचा बाईक वरून नवरगांव पुलावरून पाणी असतांना सुद्धा पुलावर थोडे पाणी आहे आपण सहज पुल ओलांडू शकतो या हेतुने ते तिघेही नवरगाव फुलावरून जात असतांना पाण्याचा अंदाज चुकला व ते पुढे न जाता पुलाच्या खाली बाईक पडली तर दोघे जुझपाचा आधार घेवुन लटकले तर एकजन पुलावरच मध्यतरी थांबुन कढल्यांला धरून होते.  त्या ठिकाणी चुरचुरा गावकरी पोहचले असता भयावह स्थिती पाहून गडचिरोली पोलिसांना माहीती दिली गडचिरोली पोलीस त्या ठिकाणी पोहचले परंतु हतबल होवून  त्यांना आल्या पावली परत जावे लागले
 आता आप्पती व्यवस्थापन  DDRF पथक जाईल बोट च्या मदतीने त्या तिघांना काढण्याचा प्रयत्न होईल असे वाटत होते. 

मात्र सांयकाळचे ७ वाजले तरीही  काहीच हालचाली दिसत नव्हत्या तेव्हा चुरचुरा येथील अनिल गेडाम व वासुदेव गेडाम यांनी दोरांच्या सहाय्याने सदर स्थळी जावून त्यां निघांना  सुखरूप बाहेर काढले चुरचुरा व नवरगांव चे अख्खे गावकरी त्या ठिकाणी पोहचले होते. त्यांना सुखरूप बाहेर काढले 
आता सरकारी यंत्रणा चुरचुरा येथे त्यांना नेवून त्यांची चौकशी करीत आहेत. त्या तिघाचे नाव अजुनही कळले नाहीत


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी …


आश्रयासाठी मंदिरात गेलेल्या महीलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी - महीला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर

 

नवी मुंबई:-

नवी मुंबईतील शीळ परिसरातील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांना फाशीच व्हायला हवी. त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असेही त्या म्हणाल्या. आज पीडित महिलेच्या कुटुंबाची त्यांनी नवी मुंबईतील घरी भेट घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. आयोगाने लगेच दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. आरोपींची अटक, तपास यादरम्यान चाकणकर पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेत होत्या.

चाकणकर यांनी गुरुवारी (दि.२५) पीडित कुटुंबाची नवी मुंबईतील त्यांच्या घरी भेट घेतली. आई-वडील, बहीण यांच्याकडून तिच्या सासरच्या त्रासाची पार्श्वभूमी समजून घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करत या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाबाबत कुटुंबियांना माहिती द्यावी, त्यांच्या शंकांचे निरसन करावे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. आरोपीवर कठोर कलमे लावून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी असेही पोलिसांना सांगितले आहे. या भेटीच्या वेळी सहायक पोलिस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील उपस्थित होते. त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती सांगितली

हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षाच व्हावी यासाठी महिला आयोग पाठपुरावा करेल. ही महिला सासरच्या छळाला सामोरे जात होती. त्यांच्यावर देखील योग्य त्या कायद्यांतर्गत कारवाई होईल. पीडित महिलेच्या कुटुंबाला, तिच्या लहान मुलाला शासकीय मदत मिळावी यासाठी ही आयोग प्रयत्न करेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

दुर्दैवाने एखाद्या महिलेला घराबाहेर पडावे लागले; तर नजीकचे पोलीस स्टेशन, वन स्टॉप सेंटर यांनी जनजागृती करणे आवश्यक आहे. अश्या महिलांना मदत मिळू शकते, असा विश्वास देण्याची गरज आहे. माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार करावा, असेही त्यांनी माध्यमांशी झालेल्या संवादात सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून …


मुख्याधिकारी साहेब अहेरीतील खड्डे बुजवा, अन्यथा सामाजिक कार्यकर्ते वर्गणी करून खड्डे बुजविणार

 सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार यांची नगर पंचायत अहेरी च्या मुख्याधिकाऱ्याकडे निवेदनातुन मागणी


अहेरी:- अहेरी नगर पंचायत हद्दीत व अहेरी शहरातील रस्त्यावर खड्डेच- खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने सदर खड्डे पाण्याने भरून आहेत.खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा असल्याचे अंदाज येत नसल्याने अहेरी शहरात नागरिकांची व वाहनांची वर्दळ नेहमीच असते म्हणून पाणी भरलेल्या खड्ड्यामुळे अपघात होण्याची  शक्यता नाकारता येत नाही म्हणून अहेरी शहरातील व प्रभागातील खड्डे बुजवा अन्यथा अहेरी शहरात सामाजिक कार्यकर्ते वर्गणी गोळा करून सदर खड्डे बुजवण्याचे प्रावधान हाती घेतील  असे अहेरी नगर पंचायत चे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी व ईशारा दिला आहे.

अहेरी शहरात व्यापार व आठवडी बाजार आणि शासकीय कामे, रुग्णालयात उपचारासाठी, विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात असे विविध कामे घेऊन सामान्य जनता व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे मोठी  वर्दळ निर्माण होते
अहेरीतील रस्त्यावर खड्डे पाण्याने भरून आहेत भरलेल्या पाण्यामुळे खड्डा किती खोल आहे याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याचे दाट शक्यता आहे आणि ये-जा करणाऱ्या नागरीकांना व वाहन धारकांना वाहतुकीस कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.करिता खड्डे बुजवणे आवश्यक आहे.नगर पंचायत ने या समस्येचा गंभीरतेने विचार करून  सदर खड्डे बुजवा अन्यथा अहेरीत वर्गणी करून खड्डे बुजवणार  मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन मागणी व ईशारा देण्यात आले आहे. 

निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र खतवार, सचिन येरोजवार युवक मंडळी उपस्थित होते


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


आणी...अचानक वाघ समोर आले,वेळ आली पण काळ आला नव्हता!


अंगावर शहारे आणणारा योगायोग 

 

चंद्रपूर:- "वेळ आली होती परंतु काळ आला नव्हता" याच म्हणी प्रमाणे वाघ अचानक समोर उभा झाल्याने एका शेतकऱ्यास जीव मुठीत धरून त्याचेकडे पहात राहावे लागत होते 
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाघ कधी आणि कुठे दिसणार हे सांगणे कठीण झाले आहे. वाघाचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप सुटतो  आणि तो अचानक समोर आला तर भीतीने  बोबळी वळून बोलणेही बंद होते. असाच प्रकार नागभीड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. गोविंदपूर रस्त्यावर मंगरुडजवळ एका शेतकऱ्यासमोर अचानक वाघ उभा राहिला.
सध्या सर्वत्र संततधार पाऊस पडत आहे. पाऊस असूनही शेतकरी आपल्या शेतात रोपे लावण्यात व्यस्त आहेत. मंगळवारी गोविंदपूर येथील रामदास खांदेवे नावाचे शेतकरी मंगरूड गावातील शेतात काम करण्यासाठी सायकलवरून गेले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास काम आटोपून ते सायकलवरून गोविंदपूर या गावी परतत होते. मंगरूड ते गोविंदपूर मार्गावरील कालव्याजवळील नागमोडी वळणावर अचानक वाघ जंगलातून बाहेर येऊन रस्त्यावर आला. दोघेही समोरासमोर उभे राहिले. दोघांच्या मागे किंवा पुढे कोणीच नव्हते. शेतकऱ्याने समोर वाघ पाहून तो अवाक होऊन आता आपले काही खरे नाही असे त्याला मनोमन  वाटत होते
तेवढ्यात मंगरुड कडून गोविंदपूरकडे जाणारी एसटी बस तेथे पोहोचली. बस चालकाने तात्काळ बस थांबवून शेतकऱ्याला वाचवण्यासाठी  वेळ वाया न घालवता एसटी बसमध्ये बसवून त्याची सायकलही बसमध्ये ठेवून एसटी बस रवाना केली तेव्हा वाघ ताबडतोब जंगलाच्या दिशेने निघून गेला 'वेळ आली होती, पण काळ आला नव्हता' या म्हणीच्या धर्तीवर शेतकऱ्याचा जीव वाचला. एसटी बस गोविंदपूर गावात पोहोचली आणि शेतकरी गावात उतरला. यावेळी वाघ यांना समोर पाहून शेतकरी काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता. एसटी चालक व वाहकाने गावात हा प्रकार सांगितल्याने वाघ व शेतकऱ्याच्या समोरासमोर उभे टाकल्याच्या घटनेची गावात खमंग जोरदार चर्चा झाली.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या …


धानोरा येथील सोनाली गेडाम ठरल्या पहिल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या लाभार्थी


विभागात 8 हजार 847 उमेदवारांची नोंदणी 10 हजार रुपये प्रतिमहा मिळणार विद्यावेतन

गडचिरोली/नागपूर दि. 25: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत राज्यातील पहिली नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील सोनाली गेडाम या युवतीला मिळाली आहे. नागपूर विभागासाठी या योजने अंतर्गत 29 हजार 500 उमेदवारांच्या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजने अंतर्गत खाजगी व शासकीय अशा 80 आस्थापनांची नोंदणी करण्यात आली असून विभागात नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्राधान्याने प्रशिक्षणासाठी नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती
श्रीमती बिदरी यांनी दिली.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याने प्रशिक्षण योजने अंतर्गत पहिली नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी अभिनंदन केले असून इतर जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढाकार घेवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या

सूचना दिल्या आहेत. धानोरा येथील सोनाली गेडाम बिएससी व एमएससीआयटी असून

त्यांची जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी कार्यालयात डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून नियुक्ती देण्यात आली असून त्यांना प्रतिमहा 6 महिन्यांपर्यत 10 हजार रुपये विद्यावेतन मिळणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता महास्वयंम या पोर्टलवर विभागातील 8 हजार 847 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. यामध्ये नागपूर

जिल्ह्यातील 3 हजार 692, वर्धा जिल्ह्यातील 855, भंडारा जिल्ह्यातील 966, गोंदिया जिल्ह्यातील 1 हजार 866, चंद्रपूर जिल्ह्यातील 1 हजार 174 तर गडचिरोली जिल्ह्यातील 294 उमेदवारांचा समावेश आहे. विभागातील 11 खाजगी तर 69 शासकीय आस्थापनामध्ये नोंदणी झालेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी 1 हजार 758 पदे अधिसूचित करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती बिदरी यांनी दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्त कार्यालयातर्फे राबविण्यात येणार आहे. उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ या
योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार असून या योजनेसाठी राज्य शासनाने 5 हजार 500 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या अंतर्गत 12 वी पास झालेल्या उमेदवाराला प्रतिमहा 6 हजार रुपये, आयटीआय अथवा पदवी असलेल्यांना 8 हजार रुपये तर पदवीधर व पदव्युत्तर शैक्षणिक आर्हता असलेल्या उमेदवारांना 10 हजार रुपये प्रतिमहा विद्यावेतन देण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांची किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असणे आवश्यक
आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उद्योजक व विद्यार्थ्याने rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येईल. तसेच या वेबसाईटवर उद्योजकांना मागणी नोंदविण्याची सुविधा आहे. विभागात खाजगी 11 व 69 शासकीय अशा 80 आस्थापनांनी 1 हजार 758 पदांची मागणी नोंदविण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप


गोमणी ते विवेकानंदपूर या रोडची झाली दुरवस्था,रोडला आले नाल्यांचे स्वरूप 


मुलचेरा:-
मुलचेरा तालुक्यातील गोमणी पासून तर विवेकानंदपूर पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर मुलचेरा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.


मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.

गेल्या पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आंबटपल्ली आणि खुद्दीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला होता. पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्याने पुलावर साचलेला गाळ आणि कचरा साफ करण्यात आला नाही. एकीकडे कचरा साचला तर दुसरीकडे खड्यात पाणी साचला आहे. त्यामुळे या पुलावर देखील अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील चार दिवसांपासून पुलावर कचरा पडून आहे मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही.

आलापल्ली ते आष्टी मार्गावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या आलापल्ली ते आष्टी रस्त्यावरील दीना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 25, 2024   

PostImage

सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू


सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केले जेरबंद,फरार आरोपींचा शोध सुरू 


वरोरा:-
 वरोरा तालुक्यातील टेमृर्डा येथून जवळपास सात लाखाची चोरी करणाऱ्या चोरांना अवघ्या 24 तासात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत सहा आरोपींना जेरबंद केले आहे 
मिळालेल्या माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शरद सीताराम गुघाणे वय 53 वर्ष हे टेभूर्डा येथे आपल्या पत्नीसह चहाचे दुकान चालवतात 17 जुलै रोजी ते व त्यांची पत्नी उघडे शटर असलेल्या चहाच्या दुकानात झोपले होते. त्यावेळी अज्ञात चोरांनी चहाच्या दुकानातून सोन्याचे दागिने, रोख एक लाख रुपये, कोको कंपनीचा मोबाईल असा एकूण 7, 80, 500 रुपयाचा माल चोरून नेला. यासंबंधीची तक्रार शरद गुधाने यांनी वरोरा पोलीस ठाण्यात करताच वरोरा येथील गुन्हे शाखा तसेच  चंद्रपूर व कोरपणा पोलिसांच्या मदतीने तपासाची चक्रे शिताफिने फिरवत गोपनीय माहितीच्या आधारे प्रदीप संजय शिरकुरे, आकाश नारायण शिरकुरे, चिंतामण संजय शिरकुरे, हरिणा प्रदीप शिरकुरे, माया देवगडे सर्व राहणार पारधी गुडा धोपटाळा तालुका कोरपणा यांचे सह विकास काळे राहणार चिनोरा यांना अटक केली व त्यांचे जवळून आठ सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या चार बांगड्या, एक चपला कंठी, सोन्याचे कानातले दागीने, सोन्याची पोत व सोन्याचा गोफ या दागिन्यासह दोन मोबाईल व चोरी करण्यासाठी वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 3324 व एक्टिवा क्रमांक एम एच
31 ईव्ही 9188 असा एकूण 6,85000 रुपयाचा माल जप्त केला. या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचे जवळून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, सहाय्यक पोलीस अधीक्षक व वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम,  चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोन्डावार, पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विनोद जांभळे, पोस्टे वरोरा, सपोनि मनोज गदादे, सपोनि विकास गायकवाड, पो.स्टे. कोरपना व पोलीस स्टेशन वरोरा येथील गुन्हे शाखा पथकातील पो.हेड.कॉ. दिपक दुधे, पो.अं. संदिप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद, राजु लोधी, यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने केली.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निदर्शनं


राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे सिरोंचात भाजप सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

 


सिरोंचा :- केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला इतर राज्यांच्या तुलनेत भरीव अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही व निधी वाटपात सुद्धा काहीच दिले नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे सिरोंचा निषेध आंदोलन करण्यात आले 
 देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला.अर्थसंकल्प देशाचा होता पण महाराष्ट्र देशातच आहे की देशाबाहेर असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे.या अर्थसंकल्पात आज पासून सुरू होणाऱ्या जाहिरात बाजीसाठी विविध योजना आहेत, पण आपल्या महाराष्ट्रासाठी काही ठोस निधी सोडा पण इतर राज्याप्रमाणे थोडेफार जरी दिले असते तर समाधान मानले असते. परंतु लोकसभा निवडणुकीत एन. डी. ए. सरकारला आलेल्या कमी जागा मुळे महाराष्ट्रातील जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागले अशी भाजपची प्रवृत्ती येथून स्पष्ट होत आहे.आंध्र प्रदेश, बिहार व देशातील इतर राज्यांना दिलेल्या मदतीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राला अर्थसंकल्पात- २०२४ मधून काहीही मिळालेले नाही.हे त्रिवार सत्य आहे.
महाराष्ट्रातील जनता ही स्वाभिमानी असून आपल्यावरील अन्याय कदापीही सहन करणार नाही. राज्यातील जनतेच्या मनातील रोष आणि भावना आपण या आंदोलना द्वारे मांडून भाजप पक्षाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे, याकरिता आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिरोंचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सिरोंचा मुख्यालयात बस स्टँड चौक येथे "अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्रात रोष, महाराष्ट्रात रोष" असे नारेबाजी करत आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला आहे,
        त्यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस चोक्कामवार, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, सचिव - विनोद नायडू,शहर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष - सलमान शेख, कार्यकर्ते - राजू मूलकला, उदय मूलकला, गणेश संड्रा, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल …


गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल जहाल नक्षल्याचे आत्मसमर्पण

 


गडचिरोली, दि. 24 : गडचिरोली जिल्ह्यात जाळपोळ व इतर गुन्ह्यात सहभागी असलेल्या जहाल नक्षल्याने पोलीसासमोर आत्मसमर्पण केले आहे 
 शासनाने 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित नक्षल्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 670 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज 24 जूलै 2024 रोजी जिल्ह्यात मुसाधर पाऊस असतानाही गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. लच्चु करीया ताडो, पार्टी सदस्य, भामरागड दलम, (वय 45), रा. भटपार ता. भामरागड, जि. गडचिरोली असे त्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार लच्चु ताडो 2012-13 पासुन गावात राहुन जनमिलिशीया म्हणून नक्षल्यांसाठी राशन आणून देणे, सेंट्री ड्युटी करणे, नक्षल्यांचे हत्यार लपवून सुरक्षित ठिकाणी ठेवणे, निरपराध इसमांचे खून करण्याआधी रेकी करुन त्याची माहिती नक्षल्यास पुरविणे, पोलीस पार्टीबद्दल नक्षल्यांना माहिती देणे तसेच नक्षल्यांचे पत्रके जनतेपर्यंत पोहचविणे व इतर काम तो करीत होता. 2023 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपर्यंत कार्यरत. त्याचा 2022 मध्ये ईरपनार गावातील रोड बांधकामावरील 19 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. तसेच 2023 मध्ये नेलगुंडा जंगल परिसरातील पायवाट रस्त्यातील जमिनीत स्फोटके पुरुन ठेवण्यात त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.

महाराष्ट्र शासनाने लच्चु करीया ताडो याचेवर 02 लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्यशासनाकडुन लच्चु करीया ताडो याला एकुण 4.5 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षल्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 22 जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर नक्षल्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप- महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व दाओ इंजिरकान कींडो, कमांण्डट 37 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे नक्षली विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले …


गंभीर आजारी महीलेस आपत्ती व्यवस्थापन पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप पोहचविले रुग्णालयात 


रानमुल - माडेमुल पोटफोडी नदीच्या पुरामुळे ६ दिवसापासून आवागमन बंद 

 गडचिरोली:-
गंभीर आजारी (साप चावल्याचा संशय) महीलेस आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने बोटीच्या सहाय्याने सुखरूप रुग्णालयात पोहचवून उपचारासाठी दाखल केले आहेत 
गडचिरोली  मुख्यालयाला पासून अवघ्या १५ कि.मी अंतरावर अतिदुर्गम भाग रानमुल ते माडेमुल असून पोटफोडी नादीला संततधार पावसामुळे पुर आल्याने गेल्या आठ दिवसापासून त्या गावांच संपर्क  तुटला आहे माडेमुल वरुन रानमुल ते गडचिरोली येणे जाणे अजुनही बंदच आहे.

दि.२४ चे रात्रौ माडेमुल येथील कल्पना परसे हि गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे तिला महिला रुग्णालय गडचिरोली येथे आणावयाचे होते. तेव्हा माडेमुल येथील गावकऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन पथक( SD RF)
यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी बोटीच्या सहाय्याने  कल्पना हिला गडचिरोली रुग्णालयात पोहचविण्यात आले. मालेमुल ते गडचिरोली संर्पक अजुनही तुटला असुन आता मात्र आप्पती व्यवस्थापन व गावकरी सहकार्य करीत आहेत.

पोटफोडी नदी पुरामुळे आजुबाजुच्या शेतात पुराचे पाणी घुसले असुन शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहेत तेव्हा शासनाने पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर हल्ला करून जागीच …


शेतात धान रोवणी करीत असताना वाघोबाने शेतकऱ्यावर  हल्ला करून जागीच केले ठार

नागभीड : -
 आपल्या स्वतःच्या शेतात धान रोवणी करीत असताना एका शेतकऱ्यावर वाघोबाने हल्ला करून शेतकऱ्यास जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मींडाळा येथील कंपार्टमेंट नं ४२०/ ७५६ मध्ये मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.  मृतक दोडकू झिंगर शेंदरे  वय(६५) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

 चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस संततधार पाऊस सुरू होता. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला.  काही बांद्यामधील रोवलेले धान वाहून गेले होते त्या ठिकाणी  दोडकू धान रोवणी करीत होता. त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले. ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळपास शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले. त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली. गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करुन  त्याचे शव
उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.
त्वरित त्या गरीब शेतकऱ्याच्या परीवारास आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे


PostImage

Vaingangavarta19

July 24, 2024   

PostImage

सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन


सरपंचानी केले गावातील शाळेचा दुरुस्तीसाठी अर्धनग्न आंदोलन 


नंदुरबार:-आपल्या गावातील शाळा दुरुस्ती करीता चक्क सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केले आहे 
खांडबारा गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेची इमारत ही जीर्ण अवस्थेत पोहचली असल्याने सरपंच अविनाश गावीत यांनी जिल्हा परिषद कडे शाळा दुरुस्ती करीता वारंवार पाठपुरावा केला मात्र या बाबतीत शासन उदासीन असल्याचे दिसून येत होते 
ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी मला निवडून दिले मात्र मी लोकांना काय उत्तर देणार म्हणून त्यांनी अनोखे आंदोलन करण्याचे ठरविले व काही ग्रामस्थांनी सुद्धा सहकार्याचा हात पुढे केला 
तेव्हा त्यानी जिल्हा परिषदेच्या पुढे अर्धनग्न आंदोलन सुरू केले 
 भारतीय लोकशाहीमध्ये गावाचा सरपंच हा तळागाळातील लोकांचा लोकसेवक असतो.

आपल्या गावातील शाळेच्या दुरुस्ती कडे शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असे सरपंचास अर्धनग्न आंदोलन करावे लागते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल 

सरपंचांना आपल्या गावातील लेकरांचा शिक्षणासाठी उत्तम सोय व्हावी म्हणून पहिल्यांदाच सरपंच कपडे काढताना पाहिला असल्याचे बोलले जात आहे सरपंच अविनाश गावित खरंच आपलं पाऊल गावाचा हितासाठी पुढे आहे आपणास शुभेच्छा आपली व खांडबारा ग्रामस्थांच्या लढाईला यश मिळेल काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे 

ही चमकोगिरी नाही तर वास्तव आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024   

PostImage

शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी …


शेतात जात असताना पती- पत्नीवर केला जंगली वराहाने हमला,पती पत्नी दोघेही जखमी

चामोर्शी तालुक्यातील कढोली येथील घटना

कार्यकारी संपादक/ प्रविण तिवाडे वैनगंगा वार्ता १९

चामोर्शी:-
तालुक्यातील कढोली (अनखोडा) या गावातील पती पत्नी मिळून आपल्या शेतशीवाराकडे जात असताना अचानक जंगली वराहाने हमला करुन जखमी केल्याची घटना 23/07/2024 ला सकाळी घडली आहे 

प्रफुल ताराचंद सिडाम वय 38 वर्ष कविता प्रफुल सिडाम वय 35 वर्ष रा. कढोली ता. चामोर्शी जिल्हा. गडचिरोली असे जंगली वराहांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पती पत्नीचे नावे आहेत

प्रफुल व त्याची पत्नी कविता दोघेही आपल्या शेतशिवाराकडे जाताना जंगली वराहांनी त्यांच्यावर हल्ला केला व फरफटत नेले त्या दोघांनी जंगली वराहांविरूद्ध भरपूर प्रमाणात प्रतिकार केला व त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटले जशी गावात ही घटना माहिती झाली ते त्यांना जखमी अवस्थेत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले व लागलीच डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत कढोली गावात जंगली डुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असून शेतीची नुकसान तर करतातच परंतू आता मानवावर सुद्धा हल्ले सुरू झाले असल्याने या हल्ल्यात जखमीना वनविभागाकडून त्वरीत आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024   

PostImage

मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ


मे़ढेबोडी, मोह‌टोला येथे लागते तळीरामांची रिघ 

अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९

वैरागड :-
 आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावामध्ये दारुबंदी असली तरी बहुतेक गावामध्ये दारुचा महापूर वाहत आहे. मेंढेबोडी आणि मोहटोला जवळील बहुतेक गांवात दारुबंदी असल्याने दारु पिण्यासाठी मेंढबोडी आणि मोहोला या गावात दररोज संध्याकाठी तळीरामांची गर्दी असल्याने महिलांचे जगणे कठीन होत असून याकडे पोलीस जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हयात दारुबंदी कायद्याने बंदी असली तरी संपूर्ण जिल्हयात
दारुचा महापूर वाहत आहे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा जिल्ह‌यातून जिल्ह्यात दररोज देशी विदेशी दारुचा पुरवठा होत असतो. तर काही गावात गावठी मोहफुलाची अवैध्य दारू विक्री सुरु आहे असाच प्रकार आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बहुतेक गोव्यामध्ये सर्रासपणे दारुविक्री सुरु असल्याचे दिसून येतेय. काही गांवात महिलाच्या व बचतगटाच्या पुढाकाराने दारुबंदी केल्याचे दिसून येते परंतु आरमोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढेबोडी आणि मोहटोला येथे मुबलक दाऊ विक्री केली जाते. मोहझरी,सुकाळा,शिवणी या गावात दारुबंदी असल्याने नजीकच्या मेंढेबोडी  येथे दारु पिणाऱ्या तळीरामांची सायंकाळच्या सुमारास गर्दी दिसून येते तर कोजबी, लोहारा, करपडा, विहीरगांव येथे दारुबंदी असल्याने न‌‌जीकच्या मोहटोला येथे दारु पिणा-यांची वर्दळ असते त्यामूळे मेंढेबोडी आणि मोहटोला ही दोन्ही गावे तडीरामासाठी आवडीचे ठिकाण असल्याचे दिसून येत आहे 

प्रतिक्रिया,
" दाऊ विक्रेत्यांचा शोध घेणे सुरु असून दाऊ विक्रने विक्री करतांना आढवल्यास त्याचे वर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल"

सागर बिट अमलदार वैरागड.


PostImage

Vaingangavarta19

July 23, 2024   

PostImage

जन्मदात्या बापाचा मुलाने दगड मारुन केला खून


जन्मदात्या बापाचा मुलाने  दगड मारुन  केला खून.


उपसंपादक/ प्रमोद झरकर 


सिंदेवाही : दिनांक २२/०७/२०२४ रोजी सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील श्री देवेंद्र तलांडे यांनी फोन वरून श्री तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही यांना माहिती दिली की,आंबेडकर चौक वॉर्ड क्र.२ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा.वासेरा यांनी आपल्या वडीलाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.

 

या माहिती नुसार सपोनी तुषार चव्हाण ठाणेदार पोलीस ठाणे सिंदेवाही  तात्काळ पोलीस ठाण्याचे सपोनि स्थूल,पोउपनी सागर महल्ले,पोहवा विनोद बावणे,पोलीस अंमलदार रणधीर मदारे यांचेसह वासेरा गावासाठी रवाना झाले.परंतु प्रशासनाने अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट घोषित केला होता.अतिवृष्टीमुळे पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वासेरा गावाकडे जाणारे सर्व रस्ते बंद होते.त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी आव्हान होते.

 

शेवटी अथक परिश्रम व पोलीस मित्र तसेच आपत्ती व्यवस्थापन यांच्या मदतीने वाकल ते जामसाळ्या मध्ये असलेल्या शेतातील नाल्यातिल कमरेच्या वर पाण्यातुन ट्रॅक्टरने मार्ग काढत जामसाळ्या पर्यँत पोहचुन पुढील प्रवास ट्रक्टरच्या मुंडीवर बसून घटनास्थळ गाठले.

 

पोलीस पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर जखमी अवस्थेत असलेले अशोक आबाजी रामटेके यांना पोलीस पथक व वासेरा गावातील युवक व त्यांचे नातेवाईक यांचे मदतीने आल्या मार्गानेच परत सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 

सदर घटनेसंबंधाने मृतक याची पत्नी अर्चना अशोक रामटेके यांनी सिंदेवाही पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की,मृतक हा उसनवार घेतलेले पैसे परत करावयाचे आहेत.तुझे कानातील सोन्याचे रिंग मला दे असे म्हटल्याने मृतकाच्या पत्नीने त्याला ५०० रुपये दिले व ज्याचे घेतले त्याला दे म्हणून सांगितले.

 

मृतकाने त्यातील ४०० रुपये देऊन १०० रुपये स्वतःकडे ठेवून घेतले.त्याबाबत मृतक व त्याचा चुलत भाऊ कैकाडू रामटेके याचे सोबत मृतकाच्या पत्नीसोबत बोलचाल करीत असतांना यातील आरोपी हा येऊन मृतकास तू दारू पिण्यासाठी घरी पैसे का मांगतोस ? तुला दारू प्यायची सवय आहे तर दारू पिऊन चुपचाप झोपस का नाही ? असे म्हटल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाला.झगडा भांडण होऊन आरोपीने मृतकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून खाली पाडले.

 

त्यानंतर मृतक उठून मनोज रामटेके यांच्या घराकडे चालत चालत जात असतांना आरोपीने मृतकास जिवाने मारण्याच्या उद्देशाने त्याचे हातातील दगड मृतकास फेकून मारल्याने कानाचे मागील बाजूस  डोक्यावर लागून मृतक गंभीर जखमी झाला.

 

ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे डॉक्टरांनी तपासनिअंती मृत घोषित केले.मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा अमित अशोक रामटेके वय २४ रा.वासेरा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास ठाणेदार,तुषार चव्हाण करीत आहेत.

 

सदर कामगिरी  मुम्मका सुदर्शन जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर,रिना जनबंधु अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, शिवलाल भगत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार तुषार चव्हाण सिंदेवाही यांचे नेतृत्वात सपोनि अतुल स्थूल,पोउपनी सागर महल्ले,अनिल चांदोरे,विनोद बावणे,रणधीर मदारे,सुहास करमकर,मोहीत मेश्राम यांनी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024   

PostImage

शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची मदत वितरित


 शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची  मदत वितरित

गडचिरोली दि.२२ : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले. 

 याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील  दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील  चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस  पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना  तसेच मौजा मरपल्ली येथील  अंकुश  पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै  २०२४ रोजी  मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी भाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली

यावेळी  आदित्य  आंधळे  गटविकास अधिकारी , सचिन  कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी ,  पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली ,. पी . डी. आत्राम तलाठी तोडसा  , देवाजी गावडे कोतवाल , सुरेश दुर्गे कोतवाल ,  सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024   

PostImage

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल


 आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण, उपचारासाठी रुग्णालयात दाखल 


धुळे:-
जिल्ह्यातील केशव स्मृती आदिवासी आश्रमशाळा कुसुंबा येथील विद्यार्थ्यांना दुषीत पाण्यामुळे आजाराची लागण झाली असून उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 
विद्यार्थ्यांना योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने लहान मुलांना आजार होत आहेत त्यामुळे सदर शाळेच्या संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधिक्षक,व ईतर बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कायदेशीर चौकशी करून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करुन संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान नाशिक शाखा (साक्री) धुळे चे गणेश गावीत, तानाजी बहीरम यांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे यांना निवेदन देऊन केली आहे 
 प्रत्यक्ष अनुदानित आश्रम शाळा कुसुंबा ता. जि.धुळे या शाळेला भेट दिली असता अजून 45 ते 47 विद्यार्थी बाधित आहेत.या घटने नंतर साफ सफाई करण्यात आली आहे.शाळा सुरू झाल्यापासून एकदा ही पाणी परीक्षण करण्यात आले नाही. स्वयंपाक चुलीवर बनवला जातो गॅसचे अनुदान लाटले जाते मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही.जे विद्यार्थी तक्रार करतात त्यांना बोर्डाच्या परीक्षेत टार्गेट केले जाते.म्हणून विद्यार्थी बोलत नाही.वरून संस्था एका भाजप पक्षाच्या राजकीय नेत्याची शाळा असून या शाळेत असा गंभीर प्रकार घडला आहे.यांच्यावर सरकार कायदेशीर कार्यवाही करणार का ? कुसुंबा येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे भयानक हाल व अपेष्टा होत आहेत 
दि.20/7/2024रोजी  कुसुंबा आदिवासी आश्रम शाळेतील दुषित पाणी पिल्याने उलट्या,ताप संडास  विद्यार्थ्यांना व्हायला लागले.दि.17/7/2024 रोजी विहीरीतील पाणी आटल्याने बाहेरून पाण्याचे टँकर मागितले असेही सांगण्यात येत आहे.एकीकडे विहीरीत संडासाचे पाणी जमिनीत मुरते असे ही शाळेतील विद्यार्थी सांगत आहे.खर तर विद्यार्थाचे निवासी इमारत आहे.त्या इमारतीला लागून विहीर व संडासाचे कुंड्या ही विहीर जवळ आहे. असे दुषित पाणी पिल्याने शाळेतील विद्यार्थी उलट्या, संडास करतांना शिक्षकांना दिसून आल्या नंतर लगेच धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले तरी काही मुले ,मुली अजून ही शुद्धीवर नव्हत्या यात लहान मुले जास्त होते.त्याच दिवशी पुन्हा दुपारी आणि संध्याकाळी तीन मुले एम्बुलंस  मध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी आणले . धुळे जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळा कुसुंबा येथील ज्या धडगाव शहादा तळोदा अक्कलकुवा या तालुक्यातील पालकांचे विद्यार्थी कुसुंबा आश्रम शाळेत असतील त्या पालकांना आपल्या मुलांना बघण्यासाठी यावे कारण की लहान लहान लेकरू या ठिकाणी राहतात ते कसे राहतात हे पाहणं गरजेचं आहे.अनुदानाच्या पायी लहान जीवाशी खेळलं जात आहे.मी स्वतः त्रास करताना बघितले आहे. तरी या शाळेतील या विद्यार्थ्यांना कशामुळे आजारी पडले याकडेही आपलं लक्ष दिलं पाहिजे प्रत्यक्षपणे आपल्या मुलांना विचारा कोणते पाणी पिले आणि ते पाणी कसे होते तेही विचारा आणि पुढील कारवाई आपल्या पालकांनीही करावी . 25 लोकांना करणे दाखवा नोटीस एकात्मित आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी धुळे यांनी बजावली आहे.तसेच झालेल्या घटनेची चौकशी तीन अधिका-या मार्फत केली जाणार आहे.संबधित संस्थाचालक व इतर लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल का?असा प्रश्र्न निर्माण झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024   

PostImage

कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव …


कंत्राटदाराच्या चुकीमुळे सती नदीवरील पूल वाहून गेला - खा.डॉ नामदेव किरसान 

कुरखेडा:-
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील सती नदीवरील पूल कंत्राटदाराच्या चुकीमुळे वाहून गेला आहे असा सनसनाटी आरोप गडचिरोली - चिमुर निर्वाचन क्षेत्राचे खा. डॉ.नामदेव किरसान यांनी केला आहे 
प्रत्यक्षात सती नदीवरील वाहुन गेलेल्या पुलाची  पाहणी करताना खासदार गडचिरोली-चीमुर लोकसभा क्षेत्र डॉ.नामदेव किरसान यांनी  यावेळी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शाळेंत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची व्यवस्था करण्यात यावी व आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी  नदीच्या पलीकडे टेन्ट उभारून डॉक्टरची टीम व ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी.
  यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी गडचिरोली वामनराव सावसाकडे, जिल्हाध्यक्ष शिवसेना सुरेंद्रभाऊ चंदेल, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी कुरखेडा जीवन पाटील नाट, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, माजी जिल्हा परिषद सदस्य जयंत पाटील हरडे, नीताराम कुमरे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी वडसा राजेंद्र बुल्ले, तालुका अध्यक्ष कुरखेडा आम आदमी पार्टी ईश्वर ठाकरे, नाशिर हासमि, मुनेश्वर बोरकर, मुजफ्फर शेख, गिरधर तीतराम, प्रभाकर तुलावी, छगन शेडमाके, नदीम नाथांनी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल एलटीवार पिकु बावणे, मोहित अत्रे, लीलाधर भरे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

Vaingangavarta19

July 22, 2024   

PostImage

मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत


मानवी सांगाडा सापडला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत 

विठ्ठलवाडा येथील घटना 

आष्टी:-
गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी सांगाडा कुणाचा याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.

चंद्रपूर अहेरी राष्ट्रीय महामार्गावर
विठ्ठलवाडा बसस्थानकापासून अवघ्या काही अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाची जुनी इमारत आहे. मागील बऱ्याच वर्षापासून कुणीही या इमारतीत वास्तव्य करीत नसल्याने दुरावस्था झालेली आहे. आजू बाजूला हिरवे गवत यासह छोटे मोठे झाडे झुडपे वाढलेली आहेत. अश्यातच गोंडपिंपरी तालुक्यात मागील दोन तीन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. दि. २१ जुलै रविवारला सकाळ पासूनच पावसाला सुरवात झाली.


दुपारच्या सुमारास पावसाने थोडी उसंत घेतल्याने गावातील एक इसम बकऱ्या चारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरात गेले. बकऱ्या चारत असतानाच अचानक जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा आढळल्याने सदर इसम चक्रावला. लागलीच सदरची माहिती गावकऱ्यांना दिली. घटनेची महिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा असल्याची माहिती गोंडपीपरी पोलीसाना देण्यात आली. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. पाहणी केली असता जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा दिसला. यात सदर अज्ञाताची डोक्याची कवटी शरीरापासून वेगळी झालेली दिसली. शरीराचा काही भागाचा सापळाही

दिसून आला. मानवी सांगाडा पोलिसांनी ताब्यात घेतला. वैद्यकीय अधिकाऱ्याला घटनास्थळी बोलविन्यात आले. रात्री सात वाजे पर्यंत चौकशी सुरू होती. तपासणीअंती मानवी सांगाडाचे काही नमुने घेण्यात आले असून पुढील तपासणी साठी पाठविण्यात आले.

एखादा वेडसर इसम तिथे वास्तव्यास राहिला अन् तिथेच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सदर इसमाचा सांगाडा एका पिशवीत भरून विठ्ठलवाडा येथील स्मशानभूमीत पुरविण्यात आला आहे. यावेळी गोंडपिंपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, विठ्ठलवाडा ग्रामपंचायत सदस्य शुभम पिंपळकर, पोलीस पाटील शारदा पिंपळकर, टीकाराम डाहुलेसह गावातील नागरिक हजर होते.

अगदी गावाला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाची जीर्ण इमारत आहे. हाकेच्या अंतरावरच खाद्य पदार्थाची दुकाने यासह इतर दुकाने आहेत. उन्हाळ्याचे दिवसात याच इमारतीच्या परिसरात तरुण मंडळी क्रिकेट खेळत असतात. लघुशंका आली की अनेकजण याच इमारत परीसराचा आधार घेतात. असे असतानाही मृतदेहाची दुर्गंधी का आली नाही असा प्रश्न अनेकांना पडला. अचानक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जीर्ण इमारतीत मानवी सांगाडा सापडल्याने नागरिकांकडून तर्क वितर्क लावले जात आहेत